शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:48 IST

‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.

नाशिक : ‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या विवाहाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे शहरात येणार असल्याचे गृहीत धरून सुकाणू समितीचे सतरा कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर दानवे यांना ‘बुक्का’ लावून औंक्षण करत काळी शाल व पोशाख देऊन सत्कार करण्यासाठी जमले होते. या आंदोलनाची कुणकुण मुंबई नाका पोलिसांना लागताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासह मुंबई नाका पोलिसांचे पथक विश्रामगृहावर दानवे यांच्या आगमनाअगोदरच येऊन पोहचले. यावेळी आगळ्या अपारंपरिक सत्काराच्या हेतूने एकत्र आलेल्या सुकाणूच्या त्या १७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कार्यकर्त्यांना भुजबळ यांनी फौजदारी प्रक्रियेनुसार कलम ११ अन्वये नोटीस बजावली आहे. सदर नोटिसीद्वारे भविष्यात त्या १७ कार्यकर्त्यांच्या वर्तनावरून कुठल्याही प्रकारे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधितांकडून सहा महिन्यांच्या दीर्घ मुदतीचे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र का घेतले जाऊ नये? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे सोमवारी (दि.२७) सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत संबंधितांनी त्यांचे म्हणणे सादर न केल्यास आपले कुठलेही म्हणणे नाही, असे समजून पोलीस अहवालानुसार कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. एकूणच सदर नोटीस बजावून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक शांततेचा व कायदा सुव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारे भंग करणाºया आंदोलनापासून लांब राहण्याचा इशाराच दिला आहे. सतरा कार्यकर्ते अपारंपरिक सत्कारासाठी जमले होते. त्यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून भविष्यात शहरात कुठल्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र सहा महिन्यांच्या मुदतीचे भरून का घेतले जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.- डॉ. राजू भुजबळ, सहायक आयुक्त

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा