शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

दीड महिन्यात सात शेतकऱ्यांची आत्महत्त्या

By admin | Updated: February 20, 2016 22:43 IST

दीड महिन्यात सात शेतकऱ्यांची आत्महत्त्या

नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या कायम असून, शनिवारी निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविल्याने नवीन वर्षात दीड महिन्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. दरम्यान, यात बहुचर्चित केबीसी या आर्थिक डबघाईस आलेल्या कंपनीतील गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. नवीन वर्षातही हे प्रमाण कायम असून, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा प्रयत्न चालविला असतानाही त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही, हे यावरून स्पष्ट झाले आहे.शनिवारी सकाळी दहा वाजता निफाड तालुक्यातील नारायणगाव येथील भागीरथ कोंडाजी आवारे (४८) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली. आवारे यांची नारायणगाव येथे २५ गुंठे जमीन आहे. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस व महसूल विभाग अधिक चौकशी करीत आहे. दीड महिन्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सात झाली असून, त्यात जिजाबाई दगा पाटील (विराणे), अशोक गोविंद महाजन (लोहोणेर), शरद रामराव बोरस्ते (दिंडोरी), देवीदास अशोक दाते (रानवड), बाळासाहेब विठोबा वाघ (शिरसमणी), अनिल आनंदा शेलार (बिटाळे) यांचा समावेश आहे. चौकट===