शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:56 IST

सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.

नाशिक : सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.मागीलवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. या पुलांना पाण्याच्या प्रवाहाचा सर्वाधिक धोका असतो. सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेमुळे ही बाब अधोरेखितही झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पुलाच्या सुरक्षिततेसाठी पूर पातळी वाढत असलेल्या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर असलेल्या गर्डरला सेन्सर लावले जाते. या सेन्सरपर्यंत पाण्याची पातळी किंवा पाण्याची लाट आदळल्यानंतर सेन्सरवरून तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. पुराची पातळी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती एसएमएसद्वारे मिळते. हा एसएमएस सातत्याने येत असतो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी पोहोचल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, तर पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत. याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या माध्यमातून हे सेन्सर कार्यान्वित करण्यात आले आहेत. शंभर ते दोनशे आणि दोनशे मीटरच्या पुढील उंचीवरील पुलांवर हे सेन्सर बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत. या पुलांवरून पाणी वाहत नाहीत. परंतु २८ पुलांचा धोका लक्षात घेता या पुलांना पाण्याचे पिलर किंवा गर्डरला लाटांचा दबाब येऊ नये यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. पाणी गर्डरपर्यंत पोहोचल्यानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याची उपाययोजना केली जाते. सेन्सरमुळे तत्काळ उपाययोजना शक्य झाली आहे. रात्री अपरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर धोका अधिक वाढतो. रात्रीच्या सुमारास पुलावरून जाणाºया वाहनांना धोक्याची कल्पना नसते. त्यामुळे हा धोका ओळखून गर्डरला पाणी लागताच तत्काळ पूल बंद करण्याची कारवाई केली जाते. यासाठी संबंधित अधिकारी ज्यांना अलर्ट आलेला असतो ते आपल्या ताफ्यासह जाऊन वाहतुकीचे नियोजन आणि गावकºयांशी चर्चा करून नियोजन करणे शक्य झाले आहे.