शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:56 IST

सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.

नाशिक : सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.मागीलवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. या पुलांना पाण्याच्या प्रवाहाचा सर्वाधिक धोका असतो. सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेमुळे ही बाब अधोरेखितही झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पुलाच्या सुरक्षिततेसाठी पूर पातळी वाढत असलेल्या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर असलेल्या गर्डरला सेन्सर लावले जाते. या सेन्सरपर्यंत पाण्याची पातळी किंवा पाण्याची लाट आदळल्यानंतर सेन्सरवरून तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. पुराची पातळी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती एसएमएसद्वारे मिळते. हा एसएमएस सातत्याने येत असतो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी पोहोचल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, तर पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत. याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या माध्यमातून हे सेन्सर कार्यान्वित करण्यात आले आहेत. शंभर ते दोनशे आणि दोनशे मीटरच्या पुढील उंचीवरील पुलांवर हे सेन्सर बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत. या पुलांवरून पाणी वाहत नाहीत. परंतु २८ पुलांचा धोका लक्षात घेता या पुलांना पाण्याचे पिलर किंवा गर्डरला लाटांचा दबाब येऊ नये यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. पाणी गर्डरपर्यंत पोहोचल्यानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याची उपाययोजना केली जाते. सेन्सरमुळे तत्काळ उपाययोजना शक्य झाली आहे. रात्री अपरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर धोका अधिक वाढतो. रात्रीच्या सुमारास पुलावरून जाणाºया वाहनांना धोक्याची कल्पना नसते. त्यामुळे हा धोका ओळखून गर्डरला पाणी लागताच तत्काळ पूल बंद करण्याची कारवाई केली जाते. यासाठी संबंधित अधिकारी ज्यांना अलर्ट आलेला असतो ते आपल्या ताफ्यासह जाऊन वाहतुकीचे नियोजन आणि गावकºयांशी चर्चा करून नियोजन करणे शक्य झाले आहे.