शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:56 IST

सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.

नाशिक : सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.मागीलवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. या पुलांना पाण्याच्या प्रवाहाचा सर्वाधिक धोका असतो. सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेमुळे ही बाब अधोरेखितही झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पुलाच्या सुरक्षिततेसाठी पूर पातळी वाढत असलेल्या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर असलेल्या गर्डरला सेन्सर लावले जाते. या सेन्सरपर्यंत पाण्याची पातळी किंवा पाण्याची लाट आदळल्यानंतर सेन्सरवरून तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. पुराची पातळी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती एसएमएसद्वारे मिळते. हा एसएमएस सातत्याने येत असतो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी पोहोचल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, तर पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत. याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या माध्यमातून हे सेन्सर कार्यान्वित करण्यात आले आहेत. शंभर ते दोनशे आणि दोनशे मीटरच्या पुढील उंचीवरील पुलांवर हे सेन्सर बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत. या पुलांवरून पाणी वाहत नाहीत. परंतु २८ पुलांचा धोका लक्षात घेता या पुलांना पाण्याचे पिलर किंवा गर्डरला लाटांचा दबाब येऊ नये यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. पाणी गर्डरपर्यंत पोहोचल्यानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याची उपाययोजना केली जाते. सेन्सरमुळे तत्काळ उपाययोजना शक्य झाली आहे. रात्री अपरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर धोका अधिक वाढतो. रात्रीच्या सुमारास पुलावरून जाणाºया वाहनांना धोक्याची कल्पना नसते. त्यामुळे हा धोका ओळखून गर्डरला पाणी लागताच तत्काळ पूल बंद करण्याची कारवाई केली जाते. यासाठी संबंधित अधिकारी ज्यांना अलर्ट आलेला असतो ते आपल्या ताफ्यासह जाऊन वाहतुकीचे नियोजन आणि गावकºयांशी चर्चा करून नियोजन करणे शक्य झाले आहे.