शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:56 IST

सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.

नाशिक : सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. या यंत्रणेमुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य झाले असून, दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.मागीलवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. या पुलांना पाण्याच्या प्रवाहाचा सर्वाधिक धोका असतो. सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेमुळे ही बाब अधोरेखितही झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पुलाच्या सुरक्षिततेसाठी पूर पातळी वाढत असलेल्या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर असलेल्या गर्डरला सेन्सर लावले जाते. या सेन्सरपर्यंत पाण्याची पातळी किंवा पाण्याची लाट आदळल्यानंतर सेन्सरवरून तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. पुराची पातळी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती एसएमएसद्वारे मिळते. हा एसएमएस सातत्याने येत असतो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी पोहोचल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, तर पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत. याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या माध्यमातून हे सेन्सर कार्यान्वित करण्यात आले आहेत. शंभर ते दोनशे आणि दोनशे मीटरच्या पुढील उंचीवरील पुलांवर हे सेन्सर बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत. या पुलांवरून पाणी वाहत नाहीत. परंतु २८ पुलांचा धोका लक्षात घेता या पुलांना पाण्याचे पिलर किंवा गर्डरला लाटांचा दबाब येऊ नये यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. पाणी गर्डरपर्यंत पोहोचल्यानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याची उपाययोजना केली जाते. सेन्सरमुळे तत्काळ उपाययोजना शक्य झाली आहे. रात्री अपरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर धोका अधिक वाढतो. रात्रीच्या सुमारास पुलावरून जाणाºया वाहनांना धोक्याची कल्पना नसते. त्यामुळे हा धोका ओळखून गर्डरला पाणी लागताच तत्काळ पूल बंद करण्याची कारवाई केली जाते. यासाठी संबंधित अधिकारी ज्यांना अलर्ट आलेला असतो ते आपल्या ताफ्यासह जाऊन वाहतुकीचे नियोजन आणि गावकºयांशी चर्चा करून नियोजन करणे शक्य झाले आहे.