शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

सिक्युरिटी पेपरमिल कारखाना नाशिकला शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:16 IST

द्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त सिक्युरिटी पेपरमिल कारखाना येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात खासदार गोडसे आणि मुद्रणालयच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली.

मनोज मालपाणी ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मुबलक जागा,पाणी, वीज, पोषक वातावरण, वाहतूक खर्च शून्य व रेल्वे-कार्गो सेवा उपलब्ध असल्याने नाशिकला मुद्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त सिक्युरिटी पेपरमिल कारखाना येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात खासदार गोडसे आणि मुद्रणालयच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. देशामध्ये भारतीय चलन नाशिकच्या चलार्थपत्र मुद्रणालय, देवास नोट प्रेस, पश्चिम बंगालमधील सालबोनी व कर्नाटकातील म्हैसूर नोट प्रेसमध्ये छापले जाते. तर स्टॅम्प पेपर नाशिकच्या चलार्थपत्र मुद्रणालयात व हैदराबाद प्रेसमध्ये छापले जातात. तसेच संपूर्ण देशात पासपोर्टची छपाई ही फक्त नाशिकच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात होते. याकरिता वर्षभरासाठी जवळपास ३० ते ४० हजार मेट्रिक टन कागद लागतो. होशंगाबाद येथे मुद्रणालय महामंडळाचा व कर्नाटकातील म्हैसूर येथे मुद्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांचा संयुक्तरीत्या पेपरमिल कारखाना आहे. म्हैसूरला सहा ते आठ हजार व होशंगाबादला सहा हजार मेट्रिक टन कागदाची निर्मिती होते. उर्वरित छपाईसाठी कागद परदेशातून मागविला जातो. देशामध्ये चलन, स्टॅम्प पेपर व पासपोर्ट छपाईसाठी सर्वाधिक कागद हा नाशिकच्या दोन्ही प्रेसला लागतो.चलन, स्टॅम्प पेपर, पासपोर्ट या महत्त्वाच्या छपाईसाठी लागणाºया कागदाची ‘सुरक्षितता’ अत्यंत महत्त्वाची असल्याने नाशिकलाच पेपरमिल कारखाना असावा अशी अनेक दिवसांची मागणी आहे. मुद्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाकडून संयुक्तरित्या दुसरा  आणि देशातील तिसरा १२ हजार मेट्रिक टन पेपरमिल कारखाना स्थापन करण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून ओरिसा, आंध्र प्रदेशमधील हैदराबाद व नाशिक येथील सर्व गोष्टींचे सर्वेक्षण, चाचपणी करण्यात येत आहे. त्यामध्ये नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयालगत गोरेवाडी व चलार्थपत्र मुद्रणालयालगत नेहरूनगर येथे मुद्रणालय महामंडळाकडे मोठी जागा उपलब्ध आहे. जवळूनच गोदावरी, दारणा या दोन नद्या वाहत असून, आयएसपी, सीएनपी प्रेसला लागणाºया पाण्याचे आरक्षणदेखील आहे. जागा, पाणी, वीज मुबलक प्रमाणात असून, सर्वात महत्त्वाचे कागद छपाईसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. तसेच रेल्वे व कार्गो सेवादेखील हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी संसदेत कारखान्यासाठी वीज, पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असून, पाणीदेखील उपलब्ध आहे. राज्य शासनाकडून कारखान्याला सवलतीची मान्यता दिल्याने कारखाना उभारणीला खर्चदेखील कमी लागणार असल्याचे यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री व अर्थ खात्याच्या निदर्शनास आणून दिले आहे. पेपर मिल कारखान्याबाबत उपसचिव सौरव गर्ग यांच्याकडे मुद्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक पार पडून सविस्तर चर्चा झाली.गुणवत्तेवर निर्णय घ्यावासिक्युरिटी पेपरमिल कारखान्याची खरी गरज नाशिकला असून, त्याकरिता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर व जनतेच्या कमी पैशात हा प्रकल्प होईल. राजनीतिपेक्षा राष्टÑनीती महत्त्वाची असून, पेपरमिल कारखान्याबाबत गुणवत्तेवर निर्णय घेण्यात यावा. - हेमंत गोडसे, खासदार, नाशिकनाशिकलाच खरी गरजसीएनपीमध्ये चलन व आयएसपीमध्ये स्टॅम्प पेपर, पासपोर्ट आदींची छपाई होते. खºया अर्थाने नाशिकलाच पेपरमिलची गरज असून, त्यामुळे सुरक्षितता बाळगली जाईल व उत्पादन खर्च कमी होईल. नोटाबंदी निर्णयाच्यावेळी प्रेस कामगारांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मदत केली आहे.- जगदीश गोडसे, सरचिटणीस, मजदूर संघ