शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुसऱ्यांदा नियोजन चुकले : संतप्त जिल्हाधिकाऱ्यांची तंबीटंचाई आराखड्याचे ‘वराती मागून घोडे’

By admin | Updated: February 19, 2015 00:15 IST

दुसऱ्यांदा नियोजन चुकले : संतप्त जिल्हाधिकाऱ्यांची तंबीटंचाई आराखड्याचे ‘वराती मागून घोडे’

नाशिक : पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी दरवर्षी कृती आराखड्याची शेवटची उपाययोजना म्हणून टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदा अवकाळी पावसाचे निमित्त शोधून पहिल्या टप्प्याच्या कामांना फाटा देण्याची नामी युक्ती शोधतानाच दुसऱ्या टप्प्यातील कामांचा सदोष आराखडा तयार केल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. परिणामी, अधिकाऱ्यांना तंबी देत येत्या दोन दिवसांत नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा व जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा अशा टप्प्याने पाणीटंचाईचे निवारण करण्याचे नियोजन (पान २ वर)ठरलेले असल्यामुळे जिल्हा परिषदेने साधारणत: आॅक्टोबर महिन्यातच पाणीटंचाई कृती आराखडा तयार करणे अपेक्षित धरण्यात आलेले आहे. तथापि, आजवर हा आराखडा कधीच वेळेत सादर करण्यात आलेला नसल्याने चालू वर्षीही जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला; परंतु याच दरम्यान जिल्ह्णात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जिल्हा परिषदेने आपल्या पूर्वीच्या नियोजनात बदल करतानाच, अवकाळी पावसामुळे पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित कामे व योजना घेण्याची गरज नसल्याचे सांगून टंचाई कृती कार्यक्रमांना ब्रेक लावला; मात्र याच दरम्यान सिन्नर तालुक्यातील आठ गावे व ५३ वाड्यांना १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याच्या वस्तुस्थितीकडे सोयीस्कर डोळेझाकही केली. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या कृती आराखड्याविषयी संशय घेतला जात असताना, अवकाळी पावसाचे निमित्त करून हा आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मागे घेऊन नव्याने आराखडा तयार केला; मात्र त्यात टंचाई कृती आराखड्याचा आकडा थेट २२ कोटींपर्यंत फुगवण्यात आला. म्हणजेच पहिल्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे दिलासा देणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दुसऱ्या टप्प्यात जानेवारी व फेब्रुवारीत पडलेल्या अवकाळी पावसाकडे दुर्लक्ष तर केलेच; उलट जिल्ह्णात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचा अप्रत्यक्ष दावा करीत २२ कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर केल्याने आपल्याभोवती संशयाचे धुके आणखी गडद केले. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुकानिहाय पाणीटंचाईचा अंदाज घेतला असता, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्याशी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी असहमती दर्शवून आराखडाच सदोष ठरविला. वस्तुस्थितीविरहित तो असल्याने फेटाळण्यात आला.