शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा नियोजन चुकले : संतप्त जिल्हाधिकाऱ्यांची तंबीटंचाई आराखड्याचे ‘वराती मागून घोडे’

By admin | Updated: February 19, 2015 00:15 IST

दुसऱ्यांदा नियोजन चुकले : संतप्त जिल्हाधिकाऱ्यांची तंबीटंचाई आराखड्याचे ‘वराती मागून घोडे’

नाशिक : पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी दरवर्षी कृती आराखड्याची शेवटची उपाययोजना म्हणून टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदा अवकाळी पावसाचे निमित्त शोधून पहिल्या टप्प्याच्या कामांना फाटा देण्याची नामी युक्ती शोधतानाच दुसऱ्या टप्प्यातील कामांचा सदोष आराखडा तयार केल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. परिणामी, अधिकाऱ्यांना तंबी देत येत्या दोन दिवसांत नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा व जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा अशा टप्प्याने पाणीटंचाईचे निवारण करण्याचे नियोजन (पान २ वर)ठरलेले असल्यामुळे जिल्हा परिषदेने साधारणत: आॅक्टोबर महिन्यातच पाणीटंचाई कृती आराखडा तयार करणे अपेक्षित धरण्यात आलेले आहे. तथापि, आजवर हा आराखडा कधीच वेळेत सादर करण्यात आलेला नसल्याने चालू वर्षीही जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला; परंतु याच दरम्यान जिल्ह्णात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जिल्हा परिषदेने आपल्या पूर्वीच्या नियोजनात बदल करतानाच, अवकाळी पावसामुळे पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित कामे व योजना घेण्याची गरज नसल्याचे सांगून टंचाई कृती कार्यक्रमांना ब्रेक लावला; मात्र याच दरम्यान सिन्नर तालुक्यातील आठ गावे व ५३ वाड्यांना १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याच्या वस्तुस्थितीकडे सोयीस्कर डोळेझाकही केली. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या कृती आराखड्याविषयी संशय घेतला जात असताना, अवकाळी पावसाचे निमित्त करून हा आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मागे घेऊन नव्याने आराखडा तयार केला; मात्र त्यात टंचाई कृती आराखड्याचा आकडा थेट २२ कोटींपर्यंत फुगवण्यात आला. म्हणजेच पहिल्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे दिलासा देणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दुसऱ्या टप्प्यात जानेवारी व फेब्रुवारीत पडलेल्या अवकाळी पावसाकडे दुर्लक्ष तर केलेच; उलट जिल्ह्णात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचा अप्रत्यक्ष दावा करीत २२ कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर केल्याने आपल्याभोवती संशयाचे धुके आणखी गडद केले. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुकानिहाय पाणीटंचाईचा अंदाज घेतला असता, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्याशी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी असहमती दर्शवून आराखडाच सदोष ठरविला. वस्तुस्थितीविरहित तो असल्याने फेटाळण्यात आला.