शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:55 IST

राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. 

ठळक मुद्दे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रक्रियेतून वगळण्याची मागणी शिक्षककांवर दहावी बारावी परीक्षांचे पेपर तपासण्याची जबाबदारीनिवडणुकीच्या कामामुळे दहावी बारावीचे निकाल लांबतील

नाशिक : राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. निवडणुकीच्या कामात शिक्षक-प्राध्यापकांना गुंतवल्यामुळे निकाल उशीरा लागण्याची शक्यता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे मुल्यमापण प्रक्रियेत व्यस्त असलेले जिल्ह्यातील ३ हजार प्राध्यापक-शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी निवडणूक आयोग, राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मुल्यमापणाच्या कामास यंदा आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. इकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असतांना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मुल्यमापण प्रक्रियेला गती दिली जाते आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचेही पेपर तपासण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या कामात बहूतांश शिक्षक व्यस्त असून उर्वरित शिक्षकांवर दहावी -बारावीच्या परीक्षा संपतात अकरावीच्या परीक्षा व प्रवेश प्रक्रियेचे काम लागणार आहे.अशा स्थितीत लोकसभा निवडणुक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक अडकले तर मुल्यमापण प्रक्रियेवर परिणाम होऊन निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण मंडळासह निवडणूक प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेतील शिक्षकांवरील जबाबदारीविषीय प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेआठ दिवस उशीराने सुरुवात शिक्षकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे यंदा बारावीचे पेपर तपासणीला आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३ हजार शिक्षण पेपर तपासणीचे काम करत आहे. बारावीचे पेपर तपासणी सुरू असतांनाच अकरावीची परिक्षा घेऊन त्यांचाही निकाल जाहिर करावा लागणार आहे. तर दहावीची परीक्षा संपताच अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होते. अशावेळी शिक्षकांना मतदान प्रक्रियेचे काम दिल्यास बारावीचे पेपर तपासणी आणि निकालावर परिणाम होऊन निकाल लांबू शकतात.-प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.

 

टॅग्स :Electionनिवडणूकexamपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालय