शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:55 IST

राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. 

ठळक मुद्दे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रक्रियेतून वगळण्याची मागणी शिक्षककांवर दहावी बारावी परीक्षांचे पेपर तपासण्याची जबाबदारीनिवडणुकीच्या कामामुळे दहावी बारावीचे निकाल लांबतील

नाशिक : राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. निवडणुकीच्या कामात शिक्षक-प्राध्यापकांना गुंतवल्यामुळे निकाल उशीरा लागण्याची शक्यता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे मुल्यमापण प्रक्रियेत व्यस्त असलेले जिल्ह्यातील ३ हजार प्राध्यापक-शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी निवडणूक आयोग, राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मुल्यमापणाच्या कामास यंदा आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. इकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असतांना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मुल्यमापण प्रक्रियेला गती दिली जाते आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचेही पेपर तपासण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या कामात बहूतांश शिक्षक व्यस्त असून उर्वरित शिक्षकांवर दहावी -बारावीच्या परीक्षा संपतात अकरावीच्या परीक्षा व प्रवेश प्रक्रियेचे काम लागणार आहे.अशा स्थितीत लोकसभा निवडणुक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक अडकले तर मुल्यमापण प्रक्रियेवर परिणाम होऊन निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण मंडळासह निवडणूक प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेतील शिक्षकांवरील जबाबदारीविषीय प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेआठ दिवस उशीराने सुरुवात शिक्षकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे यंदा बारावीचे पेपर तपासणीला आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३ हजार शिक्षण पेपर तपासणीचे काम करत आहे. बारावीचे पेपर तपासणी सुरू असतांनाच अकरावीची परिक्षा घेऊन त्यांचाही निकाल जाहिर करावा लागणार आहे. तर दहावीची परीक्षा संपताच अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होते. अशावेळी शिक्षकांना मतदान प्रक्रियेचे काम दिल्यास बारावीचे पेपर तपासणी आणि निकालावर परिणाम होऊन निकाल लांबू शकतात.-प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.

 

टॅग्स :Electionनिवडणूकexamपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालय