शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कश्यपी प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेण्याबाबत पेच

By admin | Updated: August 26, 2016 00:32 IST

महापालिका : प्रस्ताव पाठविण्यात अडचणी

नाशिक : कश्यपी धरणासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी महापालिकेला दिले असले तरी महासभेने यापूर्वीच ठराव करून कश्यपी धरण आणि प्रकल्पग्रस्तांविषयीची जबाबदारी शासनावर ढकलली आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वीच शासनाने महासभेचा मानधनावरील नोकरभरतीचा प्रस्तावही नाकारल्याने कश्यपीच्या ३७ प्रकल्पग्रस्तांना सेवेत कोणत्या आधारे घ्यायचे, असा पेच महापालिकेपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे प्रस्ताव पाठविण्याबाबत अडचणी उद्भवल्याने सदरचा विषय पुन्हा महासभेवर नेण्याचाच पर्याय प्रशासनापुढे उरला आहे. बुधवारी मंत्रालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी महापालिकेने ३७ प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना मानधनावर सेवेत रुजू करून घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला पाठविण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या. परंतु, महापालिकेच्या महासभेने २००१ मध्येच ठराव करून कश्यपी धरणाची प्रकल्प किंमत जास्त वाढल्याने आपले पाच कोटी रुपये शासनाकडून परत मागविले होते, शिवाय ज्या २४ प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घेतले होते त्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्याचे सूचित केले होते. महासभेने ठराव करून आता पंधरा वर्षांचा कालावधी लोटला आहे. सदर २४ प्रकल्पग्रस्त हे सद्यस्थितीत मनपा सेवेत कायम झाले आहेत. त्यात आणखी ३७ प्रकल्पग्रस्तांना मनपा सेवेत मानधनावर सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याने मनपापुढे पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)