शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

पोलीस ठाण्यांत ‘भंगार’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

गुन्हेगारी घटनांमधील, चोरीची, अपघातांमधील, बेवारस, आरटीओ कारवाई यातील वाहनांची निर्धारित वेळेत विल्हेवाट लावणे शक्य होत नाही़ त्यामुळे ही वाहने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात पडून राहतात़ सद्यस्थितीत शहरातील सर्व पोलीस ठाणे आवारांतील वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून, यामुळे पोलीस ठाण्यांना भंगार  गुदामाचे स्वरूप आले आहे़

विजय मोरे।नाशिक : गुन्हेगारी घटनांमधील, चोरीची, अपघातांमधील, बेवारस, आरटीओ कारवाई यातील वाहनांची निर्धारित वेळेत विल्हेवाट लावणे शक्य होत नाही़ त्यामुळे ही वाहने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात पडून राहतात़ सद्यस्थितीत शहरातील सर्व पोलीस ठाणे आवारांतील वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून, यामुळे पोलीस ठाण्यांना भंगार  गुदामाचे स्वरूप आले आहे़ त्यामुळे या वाहनांचे करायचे  तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वाहने संबंधित मालकाच्या ताब्यात दिली जातात परंतु ही प्रक्रिया प्रचंड वेळकाढूपणाची असते़  गतवर्षी पोलीस आयुक्तालय स्तरावर अशा वाहनांबाबत  विशेष परवानगी घेऊन त्यांचा लिलाव करण्यात आला  मात्र अजूनही न्यायालयीन प्रकियेतील तसेच बेवारस वाहने पोलीस ठाणे आवारात असून, त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.वाहने लावायची कोठे? पोलीस ठाण्यातील जागा कमी पडत असून, दिवसेंदिवस वाढणारी ही वाहने लावायची कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ या वाहनांसाठी स्वतंत्र जागा नसल्याने नाईलाजाने ती पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवावी लागतात़ विशेषत: महामार्गावरील पोलीस ठाण्यांमध्येही या वाहनांची संख्या अधिक आहे़ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महामार्गावरील अपघात आहे़ तसेच चोरटे चोरीसाठी वाहनांची चोरी करतात व काम झाल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला टाकून पसार होतात़ वाहनांच्या पार्टस्ची चोरीनाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात विविध गुन्ह्यांत जप्त केलेली वाहने लावलेली आहेत़ या वाहनांमध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी, ट्रक व टेम्पोचाही समावेश आहे. शहरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पंचवटी पोलीस ठाण्याच्या बाहेरील फुटपाथवरही अनेक दिवसांपासून अपघातग्रस्त वाहने उभी आहेत़ विशेष म्हणजे या गाड्यांचे काही महत्त्वाचे पार्टस् चोरट्यांनी चोरून नेले आहे़ दिवसाला दोन वाहनांची चोरीनाशिक शहराची लोकसंख्या सुमारे वीस लाखांच्या आसपास आहेत़ लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे़ त्यातच वाहन हे गरजेचे साधन बनल्याने कंपन्यांच्या नवीन वाहनांबरोबरच वाहनचोरीचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे़ सोसायट्यांचे वाहनतळ, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणाहून वाहने चोरीस जाण्याची संख्या जास्त आहे़ गत काही वर्षभरातील वाहनचोरीचा आढावा घेतल्यास कोट्यवधी रुपयांची वाहने चोरांनी चोरून नेल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे रिक्षा, कार, ट्रक व महागड्या कारचीही चोरी होऊ लागली आहे़चोरीस गेलेली (कंसात सापडलेली) वाहने़२०११ - १०७९ (२०२)२०१२ - ६१५ (१४०)२०१३ - ४८९ (११९)२०१४ - ६८५ (१४१)२०१५ - ६३४ (१००)२०१६ - ५२८ (१०९)२०१७ - ५०३ (९०) नोव्हेंबरपर्यंतएकूण : ४५३३ (९०१) विविध गुन्हे, अपघात, बेवारस अशा गाड्या तपास पूर्ण होईपर्यंत वा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यांच्या आवारात ठेवणे आवश्यक असते़ या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपल्या पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वाहनांची संख्या आयुक्तालयास कळविली होती़ त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर ४९२ वाहनांचा लिलाव प्रक्रियाही राबविण्यात आली होती. सध्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचे प्रदर्शन सुरू आहे. तसेच पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांबाबत प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कायदेशीर प्रकरणातील वाहनांबाबत न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलिसांना निर्णय घेता येत नाही़  - सचिन गोरे,  सहायक पोलीस आयुक्त, नाशिक