शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्य मंडळाच्या निर्णयाला शाळांकडून छेद

By admin | Updated: June 1, 2017 01:53 IST

शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील काही शाळांकडून जिल्ह्यात आपल्याच शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे. राज्य मंडळाकडून कोणत्याही प्रकारे गुणवत्ता यादी अथवा विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जात नसताना शाळांकडून विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्याची घाई केली जात आहे. मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी राज्यातील अनेक शाळांनी प्रसारमाध्यमांना जिल्ह्यात आपल्या शाळेचा विद्यार्थी अव्वल आल्याचे सांगून विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. मंडळाकडून गुणवत्ता यादी जाहीर न करताही शाळांनी अशाप्रकारे दावे केल्याने राज्य मंडळाच्या निर्णयाला यामुळे हरताळ फासला गेला आहे. राज्य मंडळाकडून फक्त निकाल जाहीर केला जातो. जिल्हा किंवा राज्य पातळीवर कोणताही निकाल जाहीर केला जात नसतानाही शाळांनी परस्पर दावे केल्याने राज्य मंडळाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नसल्या तरी याबाबतची माहिती घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना निकाल कळविण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना त्यांचा अंतर्गत म्हणजेच शाळास्तरावर कोण विद्यार्थी शाळेत पहिला हे कळू शकते. परंतु जिल्ह्यात आमच्या शाळेचा विद्यार्थी पहिला आल्याचे जाहीर करण्याला कोणताही आधार नसून अधिकृतरीत्या असे जाहीर करणे नियमाबाह्य ठरणारे आहे. मंडळाकडून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जात नसतानाही शाळांनी अशाप्रकारचे दावे करून जाहीर करण्याच्या या प्रकारामुळे चुकीची प्रथा पडण्याची शक्यता शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.