शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंडळाच्या निर्णयाला शाळांकडून छेद

By admin | Updated: June 1, 2017 01:53 IST

शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील काही शाळांकडून जिल्ह्यात आपल्याच शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे. राज्य मंडळाकडून कोणत्याही प्रकारे गुणवत्ता यादी अथवा विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जात नसताना शाळांकडून विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्याची घाई केली जात आहे. मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी राज्यातील अनेक शाळांनी प्रसारमाध्यमांना जिल्ह्यात आपल्या शाळेचा विद्यार्थी अव्वल आल्याचे सांगून विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. मंडळाकडून गुणवत्ता यादी जाहीर न करताही शाळांनी अशाप्रकारे दावे केल्याने राज्य मंडळाच्या निर्णयाला यामुळे हरताळ फासला गेला आहे. राज्य मंडळाकडून फक्त निकाल जाहीर केला जातो. जिल्हा किंवा राज्य पातळीवर कोणताही निकाल जाहीर केला जात नसतानाही शाळांनी परस्पर दावे केल्याने राज्य मंडळाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नसल्या तरी याबाबतची माहिती घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना निकाल कळविण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना त्यांचा अंतर्गत म्हणजेच शाळास्तरावर कोण विद्यार्थी शाळेत पहिला हे कळू शकते. परंतु जिल्ह्यात आमच्या शाळेचा विद्यार्थी पहिला आल्याचे जाहीर करण्याला कोणताही आधार नसून अधिकृतरीत्या असे जाहीर करणे नियमाबाह्य ठरणारे आहे. मंडळाकडून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जात नसतानाही शाळांनी अशाप्रकारचे दावे करून जाहीर करण्याच्या या प्रकारामुळे चुकीची प्रथा पडण्याची शक्यता शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.