शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंडळाच्या निर्णयाला शाळांकडून छेद

By admin | Updated: June 1, 2017 01:53 IST

शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील काही शाळांकडून जिल्ह्यात आपल्याच शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे. राज्य मंडळाकडून कोणत्याही प्रकारे गुणवत्ता यादी अथवा विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जात नसताना शाळांकडून विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्याची घाई केली जात आहे. मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी राज्यातील अनेक शाळांनी प्रसारमाध्यमांना जिल्ह्यात आपल्या शाळेचा विद्यार्थी अव्वल आल्याचे सांगून विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. मंडळाकडून गुणवत्ता यादी जाहीर न करताही शाळांनी अशाप्रकारे दावे केल्याने राज्य मंडळाच्या निर्णयाला यामुळे हरताळ फासला गेला आहे. राज्य मंडळाकडून फक्त निकाल जाहीर केला जातो. जिल्हा किंवा राज्य पातळीवर कोणताही निकाल जाहीर केला जात नसतानाही शाळांनी परस्पर दावे केल्याने राज्य मंडळाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नसल्या तरी याबाबतची माहिती घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना निकाल कळविण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना त्यांचा अंतर्गत म्हणजेच शाळास्तरावर कोण विद्यार्थी शाळेत पहिला हे कळू शकते. परंतु जिल्ह्यात आमच्या शाळेचा विद्यार्थी पहिला आल्याचे जाहीर करण्याला कोणताही आधार नसून अधिकृतरीत्या असे जाहीर करणे नियमाबाह्य ठरणारे आहे. मंडळाकडून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जात नसतानाही शाळांनी अशाप्रकारचे दावे करून जाहीर करण्याच्या या प्रकारामुळे चुकीची प्रथा पडण्याची शक्यता शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.