शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाशकात चाळीस तलाठ्यांची भरली ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:37 IST

गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतक-यांना बसू लागला आहे.

ठळक मुद्देसातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस पायाभुत सुविधा देण्यात शाासनानेच हात अखडता घेतला

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, नाशिक जिल्ह्याचे काम अद्यापही अपुर्ण असून, ते पुर्ण करण्यासाठी नाशिक तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाºयांची दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शाळाच भरू लागली आहे. आॅनलाईन प्रणालीने सातबारा उता-याचे ‘रि-ईडीट’चे काम करतांना येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून तलाठ्यांनी आॅफलाईन कामकाज सुरू केले असून, ते कितपत यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे.दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतक-यांना बसू लागला आहे. तथापि, जनतेच्या त्रासाविषयी देणे-घेणे नसलेल्या प्रशासन व्यवस्थेने तलाठ्यांना पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कानाडोळा केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे. संगणकीय सातबारा उतारा देण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी, त्यासाठी पायाभुत सुविधा देण्यात शाासनानेच हात अखडता घेतला आहे. प्रारंभी सदरचे काम करण्यास नाखुष असलेल्या तलाठ्यांनी संगणकीय सातबारा उता-याचे कामकाज सुरू केल्यानंतर त्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सॉफ्टवेअरमधील दोष दुर करण्यात बराच कालावधी उलटल्यानंतर सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडल्याने तलाठ्यांना मध्यरात्री उठून कामे करावी लागली. परंतु तरिही हा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.नाशिक तालुक्यात सर्वाधिक सुमारे सव्वा दोन लाख खातेदार असून, त्यांच्या सातबा-याचे संगणकीकरणाचे काम झाले आहे, मात्र त्यातील चुका दुरूस्त करण्याचे काम सध्या ‘रि-ईडीट’ मॉड्युलमध्ये सुरू आहे. आॅनलाईन प्रणालीने सदरचे काम करावे लागत असले तरी, त्यासाठी इंटरनेटचा स्पीड व सर्व्हरचा प्रश्न कायम असल्यामुळे नाशिक तालुक्याचे दहा टक्केही कामकाज झालेले नाही. अशा परिस्थितीत तलाठी व मंडळ अधिका-यांना शासनाच्या महसुलाशी संबंधित सर्व कामे बाजुला सारून निव्वळ सातबारा संगणकीकरणाच्या कामात जुंपण्यात आले असून, ४२ तलाठी व ८ मंडळ अधिकारी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उप विभागीय अधिका-यांच्या कार्यालयाच्या वरच्या सभागृहात लॅपटॉपवर कामे करीत आहेत. आॅफलाईन पद्धतीने काम करीत असतानाही दिवसभरातून जेमतेत वीस ते पंचवीस सातबारा उता-याचेच काम पुर्ण होत आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक