शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

१९ तारखेला शाळा सुरू की बंद?

By admin | Updated: August 5, 2015 00:09 IST

पोलिसांचा आततायीपणा : संस्थाचालक संभ्रमात, तर विद्यार्थी-पालकांना धास्ती

नाशिक : कुंभमेळ्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी ठिकठिकाणी नाके बंदी करण्यास सुरुवात केली असून, पोलिसांच्या या काराभारामुळे तपोवनात १९ आॅगस्टला ध्वजारोहण असले तरी संपूर्ण शहरात रस्ते कुठे बंद असणार, नोकरी व्यवसायानिमित्त कामावर जाता येईल किंवा नाही अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच विद्यार्थी आणि पालकांना याविषयी अधिक धास्ती असून, संस्थाचालक संभ्रमात आहेत, परंतु शिक्षण खात्याने याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असला तरी ठराविक दिवशीच रामकुंड परिसरात गर्दी होते. आजवर पुरोहित संघ किंवा आखाड्यांच्या वतीने साधुग्राममध्ये केल्या जाणाऱ्या ध्वजारोहणासाठी लाखोंच्या संख्येने कधीही गर्दी होत नाही, हे वास्तव असताना पोलिसांकडून ध्वजारोहण सोहळा जणू पर्वणीची रंगीत तालीम असल्यागत निर्बंध घालण्यात येत आहेत. पुरोहित संघाच्या ध्वजारोहण्याच्या वेळी पोलिसांनी रामकुंडाकडे येणाऱ्या रस्त्यांवर निर्बंध जाहीर केले होते प्रत्यक्षात अनेक ठिकाणांहून पोलीस वाहनचालकांना अडवीत होते. त्यामुळे आखाड्यांचे ध्वजारोहण हा त्या त्या साधू-महंतांपुरता मर्यादित विषय असताना पंचवटी, रामकुंड, साधुग्राम अशा सर्वच परिसरात वाहतूक मार्गात बदल केले आहेत, परंतु तरीही शहराच्या अन्य भागात पोलीस अशाच प्रकारे आततायीपणा दाखवतील अशी विद्यार्थी, पालक आणि शाळांना धास्ती वाटत असून, अनेक शाळा धोका न पत्करता सरळ १९ तारखेला शाळा बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. पोलीस, जिल्हा प्रशासन अथवा शिक्षण खात्याने तसा निर्णय घेतला नसला तरी रस्ते बंदच्या धास्तीने पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे अघोषित सुटी मिळण्याची शक्यताच अधिक आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी महापािलका शिक्षण मंडळाला शाळांच्या वेळा बदलण्याचे वा सुटीचे अधिकार दिले आहेत. मात्र, परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असे शिक्षण मंडळाचे प्रशासक दत्तात्रेय गोतिसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)