शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडकडून शिष्यवृत्ती, शैक्षणिक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:36 IST

याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक्षणपद्धतीपासून काळानुरूप बदल गरजेचे आहे.

ठळक मुद्दे २७ विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक पुरस्कार प्रदान

नाशिक : समाज सुशिक्षित जरी होत असला तरी बेरोजगारी अधिक वाढत आहे. कारण आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये काळानुरूप बदल अद्याप होत नसून केवळ पदव्यांचे कागद घेऊन सुशिक्षित तरुण नोकऱ्यांचा शोध घेताना दिसतात; कौशल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीद्वारे बेरोजगारीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील (जैन) यांनी केले.जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ नाशिक संचलित प.पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड संस्थेच्या वतीने रविवारी (दि.५) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शिष्यवृत्ती, शैक्षणिक व कौशल्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षसस्थानी मनीष सोनमिंढे, उद्योजक दिनेशकुमार कुवाड, प्रितीसुधाजी शिक्षण फंडचे अध्यक्ष मोहनलाल लोढा, संघपती राजमल भंडारी, विजय बेदमुथा, जवहरीलाल भंडारी, शांतीलाल हिरण, दत्तात्रय बच्छाव, डॉ. प्रदीप भंडारी, आशिष भन्साळी, लताबाई लोढा, प्रमीला पारख आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक्षणपद्धतीपासून काळानुरूप बदल गरजेचे आहे. कौशल्य ज्यांच्याकडे आहे, तेच प्रगती करू शकतात त्यामुळे कौशल्याधिष्ठित शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोनमिंढे यांनीही उपस्थित पुरस्कारार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आयुष्यात येणाºया संकटांवर आपल्या इच्छाशक्ती जिद्दीच्या बळावर मात करावी, असे आवाहन केले. दरम्यान, पाटील यांना शिक्षणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. कन्हैयालाल बलदोटा परिवाराच्या वतीने दिल्या जाणा-या ‘कौशल्य पुरस्कार’ने गौरविण्यात आले. ११ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच २७ विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. दरम्यान, यावेळी समाजातील गरजुंना शिक्षणासाठी हातभार लागावा, याकरिता फंडच्या माध्यमातून सुमारे आठ लाखांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रास्तविक अ‍ॅड. विद्युलता तातेड यांनी केले. सूत्रसंचालन, सतीश कोठारी, प्रा.लोकेश पारख यांनी केले.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक