शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

टंचाई आराखड्यात त्र्यंबकेश्वर  तालुक्यातील २२ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:25 IST

यावर्षीच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाम फाउण्डेशन तालुक्यातील सोमनाथनगर येथे प्रवेश करून लोकसहभागातून तेथील पाणीटंचाई दूर करणार असल्याचेही त्यांनी सांसिगतले.

त्र्यंबकेश्वर : यावर्षीच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाम फाउण्डेशन तालुक्यातील सोमनाथनगर येथे प्रवेश करून लोकसहभागातून तेथील पाणीटंचाई दूर करणार असल्याचेही त्यांनी सांसिगतले. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत गावित यांनी ही माहिती दिली. तालुका टंचाईमुक्त होण्यासाठी गावोगावी साठवण तलाव बांधणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळाचे निवारण करण्यासाठी उपयोगी असताना तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे गावोगावी लाखो रुपयांची कामे होऊनसुद्धा उपयोग होत नाही. त्यामुळे तालुक्यात दरवर्षी टंचाईचे भीषण संकट उभे राहत असल्याचे गावित यांनी यावेळी सांगितले. या संकटातून सुटका होण्यासाठी पाझर तलावाऐवजी गावोगावी साठवण तलाव होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात जलयुक्तची कामे करताना नियम व निकष शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीड, परभणीसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचे निकष सरसकट संपूर्ण राज्याला लावणे अन्यायकारक आहे. प्रत्यक्षात प्रत्येक जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, पंचायत समिती सदस्य मोतीराम दिवे, अलका झोले, देवराम मौळे, देवराम भस्मे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे, हरसूलचे संदीप पाटील, अजय सूर्यवंशी, पंचायत समितीचे ओंकार जाधव स्थानिक स्तरचे खाडे उपस्थित होते.जलयुक्त कामे बिनकामाचेदरवर्षी लाखो रु पये खर्च करत जलयुक्तची कामे तालुक्यात केली जातात. परंतु पाझर तलाव व सीमेंट नाला बांध बांधणे यासारखी कामे करूनही पाणी टंचाई दूर होत नाही.जलयुक्तच्या कामात व नियमात बदल करून साठवण तलाव बांधणे गरजेचे असल्याचे मत आमदार गावित यांनी व्यक्त केले.आमदारांची नाराजीतालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी पाणीपुरवठा योजना बंद असल्याने पाणीटंचाईबाबत काय उपाययोजना करण्यात येतील, याचा आढावा घेऊन सन २०१८-१९ च्या जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड करावयाची असल्याने काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने महत्त्वपूर्ण बैठकींना अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, कामात दिरंगाई, कामे पूर्ण न होणे आदी कारणांवरून आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपस्थित ग्रामस्थांनी जलयुक्तची कामे ही पाणी असलेल्या ठिकाणीच होत असून, कामांकडे अधिकारी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी गावित यांच्याकडे केल्या. यावेळी वनविभागाच्या कर्मचाºयांनी पाण्यासाठी होणाºया कामात अडवणूक न करण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद