शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्यात त्र्यंबकेश्वर  तालुक्यातील २२ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:25 IST

यावर्षीच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाम फाउण्डेशन तालुक्यातील सोमनाथनगर येथे प्रवेश करून लोकसहभागातून तेथील पाणीटंचाई दूर करणार असल्याचेही त्यांनी सांसिगतले.

त्र्यंबकेश्वर : यावर्षीच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाम फाउण्डेशन तालुक्यातील सोमनाथनगर येथे प्रवेश करून लोकसहभागातून तेथील पाणीटंचाई दूर करणार असल्याचेही त्यांनी सांसिगतले. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत गावित यांनी ही माहिती दिली. तालुका टंचाईमुक्त होण्यासाठी गावोगावी साठवण तलाव बांधणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळाचे निवारण करण्यासाठी उपयोगी असताना तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे गावोगावी लाखो रुपयांची कामे होऊनसुद्धा उपयोग होत नाही. त्यामुळे तालुक्यात दरवर्षी टंचाईचे भीषण संकट उभे राहत असल्याचे गावित यांनी यावेळी सांगितले. या संकटातून सुटका होण्यासाठी पाझर तलावाऐवजी गावोगावी साठवण तलाव होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात जलयुक्तची कामे करताना नियम व निकष शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीड, परभणीसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचे निकष सरसकट संपूर्ण राज्याला लावणे अन्यायकारक आहे. प्रत्यक्षात प्रत्येक जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, पंचायत समिती सदस्य मोतीराम दिवे, अलका झोले, देवराम मौळे, देवराम भस्मे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे, हरसूलचे संदीप पाटील, अजय सूर्यवंशी, पंचायत समितीचे ओंकार जाधव स्थानिक स्तरचे खाडे उपस्थित होते.जलयुक्त कामे बिनकामाचेदरवर्षी लाखो रु पये खर्च करत जलयुक्तची कामे तालुक्यात केली जातात. परंतु पाझर तलाव व सीमेंट नाला बांध बांधणे यासारखी कामे करूनही पाणी टंचाई दूर होत नाही.जलयुक्तच्या कामात व नियमात बदल करून साठवण तलाव बांधणे गरजेचे असल्याचे मत आमदार गावित यांनी व्यक्त केले.आमदारांची नाराजीतालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी पाणीपुरवठा योजना बंद असल्याने पाणीटंचाईबाबत काय उपाययोजना करण्यात येतील, याचा आढावा घेऊन सन २०१८-१९ च्या जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड करावयाची असल्याने काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने महत्त्वपूर्ण बैठकींना अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, कामात दिरंगाई, कामे पूर्ण न होणे आदी कारणांवरून आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपस्थित ग्रामस्थांनी जलयुक्तची कामे ही पाणी असलेल्या ठिकाणीच होत असून, कामांकडे अधिकारी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी गावित यांच्याकडे केल्या. यावेळी वनविभागाच्या कर्मचाºयांनी पाण्यासाठी होणाºया कामात अडवणूक न करण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद