शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा

By admin | Updated: July 15, 2016 23:42 IST

मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा

नाराजी : भाव वाढल्याने नागरिकांचे हालमालेगाव कॅम्प : मालेगावी राज्यासह बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापारी आडत्यांचा अडतीबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याने शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जो माल शिल्लक आहे तो चढ्या दराने घाऊक व किरकोळ बाजारात विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.शासनाने आडत्यांनी अडतमध्ये नवीन नियमावलीचा वापर करावा यासाठी जारी केलेल्या अध्यादेशास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारात दैनंदिन लागणाऱ्या भाजीपाल्यासह इतर वस्तूंचा तुटवडा झाला आहे. व्यापाऱ्यांनी कडकडीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथे काही ठिकाणी भाजीपाला विक्रीस थेट शेतकऱ्यांमार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना देण्यात येत असला तरी या मालाचा तुटवडा भासत आहे. माल कमी व मागणी जादा यामुळे मालाच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. खिशास कात्री लागत आहे. एव्हाना कमी दर असलेली हिरवी मिरची तब्बल २५ रुपये पाव व ८० ते १०० रुपये किलो, बटाटा ४० रुपये किलो, कोथिंबीर १६० रुपये तर १५ रु. जुडी, टमाटे ६० ते ८० रुपये किलो, इतर हिरवा भाजीपाला ६० ते ८० रुपये व १० ते १५ रुपये जुडीप्रमाणे चढ्या दराने विक्री होत आहे. याबाबत नाशिकमध्ये आडत्यांनी पावणेचार टक्के अडत घ्यावी असा निर्णय झाला आहे. परंतु मालेगावी अद्याप व्यापारी आठ टक्के अडत, एक टक्का मार्केट फी अशा आकारणीवर ठाम आहेत. व्यापारी आडत्यांकडून माल न घेता सरळ शेतकऱ्यांकडून माल घेण्याच्या मनस्थितीत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. आडते व व्यापाऱ्यांच्या तिढ्यांमुळे ग्राहकांची परवड होत आहे. या संपावर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)