शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा

By admin | Updated: July 15, 2016 23:42 IST

मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा

नाराजी : भाव वाढल्याने नागरिकांचे हालमालेगाव कॅम्प : मालेगावी राज्यासह बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापारी आडत्यांचा अडतीबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याने शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जो माल शिल्लक आहे तो चढ्या दराने घाऊक व किरकोळ बाजारात विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.शासनाने आडत्यांनी अडतमध्ये नवीन नियमावलीचा वापर करावा यासाठी जारी केलेल्या अध्यादेशास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारात दैनंदिन लागणाऱ्या भाजीपाल्यासह इतर वस्तूंचा तुटवडा झाला आहे. व्यापाऱ्यांनी कडकडीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथे काही ठिकाणी भाजीपाला विक्रीस थेट शेतकऱ्यांमार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना देण्यात येत असला तरी या मालाचा तुटवडा भासत आहे. माल कमी व मागणी जादा यामुळे मालाच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. खिशास कात्री लागत आहे. एव्हाना कमी दर असलेली हिरवी मिरची तब्बल २५ रुपये पाव व ८० ते १०० रुपये किलो, बटाटा ४० रुपये किलो, कोथिंबीर १६० रुपये तर १५ रु. जुडी, टमाटे ६० ते ८० रुपये किलो, इतर हिरवा भाजीपाला ६० ते ८० रुपये व १० ते १५ रुपये जुडीप्रमाणे चढ्या दराने विक्री होत आहे. याबाबत नाशिकमध्ये आडत्यांनी पावणेचार टक्के अडत घ्यावी असा निर्णय झाला आहे. परंतु मालेगावी अद्याप व्यापारी आठ टक्के अडत, एक टक्का मार्केट फी अशा आकारणीवर ठाम आहेत. व्यापारी आडत्यांकडून माल न घेता सरळ शेतकऱ्यांकडून माल घेण्याच्या मनस्थितीत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. आडते व व्यापाऱ्यांच्या तिढ्यांमुळे ग्राहकांची परवड होत आहे. या संपावर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)