शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सयाजीराव गायकवाड ‘भारतरत्न’चे हक्कदार- राजमाता शुभांगिनीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 06:02 IST

मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित प्रकाशन मंचचे उद्घाटन व महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांवरील ५० ग्रंथांचे प्रकाशन शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले.

धनंजय वाखारेनाशिक : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे सुद्धा भारतरत्नचे हक्कदार आहेत. शासनकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा महाराजांच्या पणतूसून व बडोदा येथील महाराजा गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केली. 

मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित प्रकाशन मंचचे उद्घाटन व महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांवरील ५० ग्रंथांचे प्रकाशन शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, चरित्र साधन प्रकाशन समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, उच्चशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. धनराज माने उपस्थित हाेते. 

शुभांगिनीराजे गायकवाड म्हणाल्या, आधुनिक भारताच्या जडणघडणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते प्रजावंत सुशासक होते. त्यांचा अनमोल वैचारिक वारसा पुढे नेण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यांच्या ग्रंथांमधून महाराजांची नव्याने ओळख होणार असून, हे काम राष्ट्रस्तरावरही झाले पाहिजे. नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या महाराजांनी समाजाच्या सर्वच घटकांसाठी केलेले काम दिशादर्शक आहे. जो अनेकांचा पोशिंदा राहिला त्याचे साहित्य मात्र अनेक वर्षांपासून प्रकाशित होऊ शकले नव्हते. महाराष्ट्र सरकारने त्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांचे विचार अंमलात आणणारा हा राजा होता. त्यांचा विचार पोहोचविण्याचे काम विविध माध्यमांतून केले जाईल, अशी ग्वाही दिली. समितिचे सदस्य सचिव बाबा भांड यांनी ५० ग्रंथ प्रकाशनामागची भूमिका विशद केली. 

उदय सामंत यांची ऑनलाइन उपस्थिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत हे विमानात बिघाड झाल्यामुळे नाशिकला पोहोचू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी ऑनलाइन हजेरी लावत उपस्थितांशी संवाद साधला.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ