शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सावरकर यांच्या कार्याचा लखनौ विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 19:58 IST

नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात नाशिकनजीकचे भगूर ही जन्मभूमी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंह यांच्याही कार्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचाही अंतर्भाव

नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात नाशिकनजीकचे भगूर ही जन्मभूमी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंह यांच्याही कार्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी या नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा बदल लखनौ विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलकडून मान्यता मिळाल्यानंतर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा आणि देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये या साहित्याच्या अभ्यासाची दालने खुली करावीत, अशी मागणी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांकडे भारतीय नजरेतून पाहण्यासाठी उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विविध विचारवंतांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यशास्त्राच्या विषयामध्ये प्रथमच दोन उजव्या विचारधारेच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. त्याबरोबच प्रथमच अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्येदेखील चौधरी चरणसिंह, राम मनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांसोबतच महात्मा गांधी यांचे विचारदेखील शिकवले जाणार आहेत. त्यामध्ये गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेडी, विश्वस्ताचा विचार, साध्या राहणीवर आधारित आर्थिक विचार, सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकार, समानता, अहिंसा आदी विचारांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास