शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सावरकरांचे जन्मस्थान लवकरच राष्ट्रीय स्मारक

By admin | Updated: February 25, 2015 23:57 IST

सावरकरांचे जन्मस्थान लवकरच राष्ट्रीय स्मारक

भगूर : ब्रिटिशांविरुद्ध संघर्षासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.भगूर ही सावरकरांची जन्मभूमी. याठिकाणी सावरकरांचे स्मारक व्हावे ही अनेक वर्षांची मागणी होती. १९९१ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भगूर येथे भेट दिली त्यावेळी राज्यात युतीचे सरकार आल्यास सावरकरांच्या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर केले जाईल, अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यानुसार २८ मे १९९८ रोजी या घोषणेची अंमलबजावणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते या राज्यस्मारकाचे उद्घाटन झाले. सावरकरांचे स्मारक झाल्यापासून याठिकाणी आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत ३४ लाख पर्यटकांनी स्मारकाला भेट दिली आहे. तथापि, या स्मारकाचे आता राष्ट्रीय स्मारक म्हणून रूपांतर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी या स्मारकाला भेट दिल्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार या स्मारकाचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, हे स्मारक राष्ट्रीय होत असताना येथील अडचणींकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, तसेच अन्य कोणत्याही सुविधा नाहीत. ज्या देवीच्या आशीर्वादाने सावरकरांनी स्वातंत्र्य लढा उभारला त्या अष्टभुजा देवीची मूर्ती खंडोबा मंदिरात ठेवण्यात आली आहे. तसेच सावरकरांचे साहित्य या स्मारकात उपलब्ध नाही. पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेदेखील रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी स्मारकाच्या परिसरात फिरतात, तसेच स्मारकाभोवती हातगाडी आणि फेरीवाल्यांचा गराडा पडतो यामुळे स्मारकाचे पावित्र्य नष्ट होते.