शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सावरकरांच्या जन्मभूमीत दशक्रिया विधी घाट मृत्यूशय्येवर !

By श्याम बागुल | Updated: September 13, 2018 15:23 IST

सावरकर उद्यानासमोर व दारणानदी किनाराच्या सौंदर्यात तत्कालीन खासदार देवीदास पिंगळे याचे निधीतून लाखो रुपये खर्च करून दशक्रिया घाट सभामंडप भगूर पालिकेने बांधला. त्यानंतर मात्र भगूर पालिकेने गेल्या १३ वर्षांपासून या वास्तूकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने येथील सभामंडपात दिवस

ठळक मुद्देभिकारी, दारुड्यांचे आश्रयस्थान : दरवाजा, खिडक्या गायबउंदीर, घूस व सापाचे सर्रास दर्शन होत आहे

नाशिक : येथील दारणानदी तीरावरील दशक्रिया विधी घाटच मृत्युशय्येवरच पडला असून, तेथील सभामंडप भटके कुत्रे, डुकरे, भिकारी आणि दारुड्याचे आश्रयस्थान झाले असल्याने क्रियाकर्मासाठी येणाऱ्या नागरिकांना या सर्व यातना सहन करूनच मार्गक्रमण करावा लागत आहे.सावरकर उद्यानासमोर व दारणानदी किनाराच्या सौंदर्यात तत्कालीन खासदार देवीदास पिंगळे याचे निधीतून लाखो रुपये खर्च करून दशक्रिया घाट सभामंडप भगूर पालिकेने बांधला. त्यानंतर मात्र भगूर पालिकेने गेल्या १३ वर्षांपासून या वास्तूकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने येथील सभामंडपात दिवस रात्र दारुडे व भिकारी झोपतात आणि कुत्रे आराम करतात, तर केसकर्तनासाठी केलेल्या दोन स्लॅपकुटीयाचा वापर जुगार खेळण्यासाठी केला जात आहे. त्याच्या फरशा तोडून टाकल्या असून, कपडे परिधान खोलीच्या बाथरूमचा दरवाजा व खिडक्या चोरून नेल्या आहेत. सर्वत्र वास्तूमध्ये घासगवत उगवले असून, सीमेंटचे ओटे तुटून त्याच्या फरशा उखडून गेल्या आहेत. घाटाच्या एका बाजूची कंपाउंड भिंत तुटून पडल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नदीपात्रात आंघोळीसाठी जाण्यासाठी करण्यात आलेल्या पाय-यांचीही दुरवस्था झाली असून, त्यावरही गवत उगल्याने रस्ता बंद झाला आहे. त्याठिकाणी उंदीर, घूस व सापाचे सर्रास दर्शन होत आहे. भगूर पालिकेचे कामगार साफसफाई करत नसल्याने ज्याच्या घरी दशक्रिया विधी होणार आहे त्यांनाच जाऊन अगोदर घाटावर जाऊन साफसफाई करावी लागली आहे. घाटाला लागलेली घर घर पाहता, भगूर पालिकेने निदान आठवड्यातून एकदा तरी, परिसरात स्वच्छता करावी व पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक