शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सरपंचाचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:52 IST

सिन्नर : अविश्वास ठरावाच्या विरोधात तालुक्यातील निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब रामनाथ सानप यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिल्याने सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे निमगाव-सिन्नर : अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा

सिन्नर : अविश्वास ठरावाच्या विरोधात तालुक्यातील निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब रामनाथ सानप यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिल्याने सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.अविश्वास ठरावासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीची नोटीस आपल्यासह बाळू चंद्रमोरे या सदस्यास मिळाली नसल्याचा दावा सरपंच सानप यांनी केला होता. त्याचा आधार घेत त्यांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील करून अविश्वास ठराव मंजूर झालेल्या सभेस आव्हान दिले होते. त्यांच्या विरोधात आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव तहसीलदारांनी २४ आॅक्टोबर २०१८ राजी बहुमताने मंजूर केला होता. त्यावर सानप यांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील करत आपल्या विरोधात मंजूर झालेल्या ठरावाची प्रतिक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप केला होता.यावेळी उपस्थित आठ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याने ८ विरुद्ध ० असा ठराव मंजूर झाला. त्यावर सरपंच सानप यांनी अपर जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करत तहसीलदार, ग्रामसेवक यांच्यासह अन्य सदस्यांना प्रतिवादी केले होते. ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत सानप यांचे अपील फेटाळण्यात आले.सदर निकालाची प्रत तहसीलदारांना पाठविण्यात आली असून, संबंधिताना हा आदेश बजावून तसा अहवाल विहित मुदतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवकासह गटविकास अधिकाºयांनाही माहितीसाठी या आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत विकासकामे करताना सरपंच सानप सदस्यांना विचारात घेत नसल्याचा आरोप करत सदस्य जयसिंग नागरे, शोभा सानप, सुनीता सांगळे, सचिन सानप, विमल सानप, कविता सानप, छाया सानप, संजय सानप या आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास दाखल केला होता. यावेळी सरपंच बाळासाहेब सानप आणि बाळू चंद्रमोरे हे दोन सदस्य अनुपस्थित होते. मात्र सभागृहाच्या नियमाप्रमाणे २/३ पेक्षा जास्त सदस्य यावेळी उपस्थित असल्याने सभेचे कामकाज चालविण्यात आले.