शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी स्वच्छतेसाठी सरपंच झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:13 IST

नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे.

सायखेडा : नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखाघालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे. पालकमंत्री महाजन मुंबईत असल्याने शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही; मात्र लवकरच गोदाकाठच्या सर्व गावातील सरपंच आणि पदाधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत ठराव आणि निवेदन देण्यात येणार आहे. गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे यापूर्वी सायखेडा, चांदोरी, करंजगाव आदी भागात अडकलेल्या पाणवेली वाहून गेल्या, तर पुन्हा नाशिक भागातून पाणवेली वाहत आल्या आहे. नदीपात्रात आढळणारे कोंबडा, रऊ, कटली, मरळ, शिंगी, वाडीस, तालेपा, बळू, माळी, बोदीड, गेरुंजी, सोनार, भिंगार, खडशी, नवरंग, झिंगा, वाबळी, वाम, बांगूर आदी हजारो मासे मृत झाले आहे. दूषित पाण्याने पाण्यावर हिरवाई, तसेच मृत माशांचा थर, त्यातग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने समस्यांत आणखी भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पाऊलेउचलावी, अशी मागणी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी केली आहे.पाण्याला दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारीगोदावरी उगमस्थानापासूनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातीरावर असलेल्या डॅमवर अनेक दिवसांपासून पाणी साचून होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असूनही नाहक त्रास सहन करावा लागतो. सदर प्रश्न ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणला होता. या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदी