शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गोदावरी स्वच्छतेसाठी सरपंच झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:13 IST

नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे.

सायखेडा : नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखाघालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे. पालकमंत्री महाजन मुंबईत असल्याने शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही; मात्र लवकरच गोदाकाठच्या सर्व गावातील सरपंच आणि पदाधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत ठराव आणि निवेदन देण्यात येणार आहे. गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे यापूर्वी सायखेडा, चांदोरी, करंजगाव आदी भागात अडकलेल्या पाणवेली वाहून गेल्या, तर पुन्हा नाशिक भागातून पाणवेली वाहत आल्या आहे. नदीपात्रात आढळणारे कोंबडा, रऊ, कटली, मरळ, शिंगी, वाडीस, तालेपा, बळू, माळी, बोदीड, गेरुंजी, सोनार, भिंगार, खडशी, नवरंग, झिंगा, वाबळी, वाम, बांगूर आदी हजारो मासे मृत झाले आहे. दूषित पाण्याने पाण्यावर हिरवाई, तसेच मृत माशांचा थर, त्यातग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने समस्यांत आणखी भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पाऊलेउचलावी, अशी मागणी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी केली आहे.पाण्याला दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारीगोदावरी उगमस्थानापासूनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातीरावर असलेल्या डॅमवर अनेक दिवसांपासून पाणी साचून होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असूनही नाहक त्रास सहन करावा लागतो. सदर प्रश्न ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणला होता. या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदी