शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"फिल्टर"च्या पाण्याने माठावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:21 IST

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या ...

ठळक मुद्देचांदोरी : मागणी घटली ; पाण्याच्या जारला आले महत्त्व

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला महत्त्व देत आहे. पर्यायाने पारंपरिक माठ विक्री व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी उपलब्ध होते, शिवाय थंड करण्यासाठी घरातील फ्रीज उपलब्ध असल्याने आज तरी मातीच्या माठाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जात होते. उन्हाळा आला की त्याची सर्वत्र विशेष मागणी असायची. आता दिवसाला केवळ ८ ते १० माठाची विक्री होत आहे. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या सवलतीच्या दरात अनेक नवनविन उपकरणे उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल त्याआधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पाण्याचे प्लांट सुरू झाल्याने नागरिकांचा कलही त्यांच्याकडे वाढला आहे.१० रुपयात २० लिटर शुद्ध पाणी शुद्ध करून मिळते तसेच ती ही घरपोच सेवा असल्याने प्रत्येकाच्या घरात माठा ऐवजी जारच दिसत आहेत. पूर्वी १५० ते २०० रुपयांना मिळणारे माठ नागरिक दोन दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोजच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी दिसून येते. पर्यायाने माठाला मागणी काही प्रमाणात ओसरली आहे.ग्रामीण भागात ही फिल्टर प्लांट सुरू झाल्याने नागरिक जारच्या पाण्याला महत्त्व देत असून अनेकांना रोजगार ही मिळाला आहे.- निलेश कोटमे, संचालक वॉटर प्लॅन्ट, चांदोरी.                   

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSummer Specialसमर स्पेशल