शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"फिल्टर"च्या पाण्याने माठावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:21 IST

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या ...

ठळक मुद्देचांदोरी : मागणी घटली ; पाण्याच्या जारला आले महत्त्व

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला महत्त्व देत आहे. पर्यायाने पारंपरिक माठ विक्री व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी उपलब्ध होते, शिवाय थंड करण्यासाठी घरातील फ्रीज उपलब्ध असल्याने आज तरी मातीच्या माठाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जात होते. उन्हाळा आला की त्याची सर्वत्र विशेष मागणी असायची. आता दिवसाला केवळ ८ ते १० माठाची विक्री होत आहे. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या सवलतीच्या दरात अनेक नवनविन उपकरणे उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल त्याआधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पाण्याचे प्लांट सुरू झाल्याने नागरिकांचा कलही त्यांच्याकडे वाढला आहे.१० रुपयात २० लिटर शुद्ध पाणी शुद्ध करून मिळते तसेच ती ही घरपोच सेवा असल्याने प्रत्येकाच्या घरात माठा ऐवजी जारच दिसत आहेत. पूर्वी १५० ते २०० रुपयांना मिळणारे माठ नागरिक दोन दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोजच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी दिसून येते. पर्यायाने माठाला मागणी काही प्रमाणात ओसरली आहे.ग्रामीण भागात ही फिल्टर प्लांट सुरू झाल्याने नागरिक जारच्या पाण्याला महत्त्व देत असून अनेकांना रोजगार ही मिळाला आहे.- निलेश कोटमे, संचालक वॉटर प्लॅन्ट, चांदोरी.                   

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSummer Specialसमर स्पेशल