शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

"फिल्टर"च्या पाण्याने माठावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:21 IST

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या ...

ठळक मुद्देचांदोरी : मागणी घटली ; पाण्याच्या जारला आले महत्त्व

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला महत्त्व देत आहे. पर्यायाने पारंपरिक माठ विक्री व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी उपलब्ध होते, शिवाय थंड करण्यासाठी घरातील फ्रीज उपलब्ध असल्याने आज तरी मातीच्या माठाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जात होते. उन्हाळा आला की त्याची सर्वत्र विशेष मागणी असायची. आता दिवसाला केवळ ८ ते १० माठाची विक्री होत आहे. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या सवलतीच्या दरात अनेक नवनविन उपकरणे उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल त्याआधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पाण्याचे प्लांट सुरू झाल्याने नागरिकांचा कलही त्यांच्याकडे वाढला आहे.१० रुपयात २० लिटर शुद्ध पाणी शुद्ध करून मिळते तसेच ती ही घरपोच सेवा असल्याने प्रत्येकाच्या घरात माठा ऐवजी जारच दिसत आहेत. पूर्वी १५० ते २०० रुपयांना मिळणारे माठ नागरिक दोन दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोजच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी दिसून येते. पर्यायाने माठाला मागणी काही प्रमाणात ओसरली आहे.ग्रामीण भागात ही फिल्टर प्लांट सुरू झाल्याने नागरिक जारच्या पाण्याला महत्त्व देत असून अनेकांना रोजगार ही मिळाला आहे.- निलेश कोटमे, संचालक वॉटर प्लॅन्ट, चांदोरी.                   

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSummer Specialसमर स्पेशल