शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

संजय वाघ यांना बालसाहित्यिक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:20 IST

मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त्याआधी सावाना बालभवनच्या वतीने ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देसावानाचा उपक्रम : पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

नाशिक : मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त्याआधी सावाना बालभवनच्या वतीने ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, किशोर पाठक, अ‍ॅड. अभिजीत बगदे, नगरसेविका सरिता सोनवणे, श्रीकांत बेणी, शंकर बर्वे, लेखक डॉ. विशाल तायडे, संजय करंजकर, ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील छायाची भूमिका साकारणारी मिताली साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मनपाच्या ३२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी तीन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करून मतदान पद्धतीने वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीला सर्वाधिक पसंती दिल्याने त्यांना पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाघ यांना स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्लीची मुले आजी-आजोबांकडून होणाºया संस्कारास मुकले असून, आत्मविश्वास हरवून बसले आहेत. त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीची निर्मिती केल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. तायडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी बालकलाकार मिताली हिची उपस्थित विद्यार्थ्यांनीच विविध प्रश्न विचारून मुलाखत घेण्यात आली. प्रास्ताविक करंजकर यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा बोºहाडे यांनी केले.बालसाहित्य निर्मितीस चालना : डॉ़ धर्माधिकारीयावेळी बोलताना डॉ. धर्माधिकारी यांनी या उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच सावानाच्या अशा उपक्रमांमुळे दर्जेदार बालसाहित्याच्या निर्मितीस अधिकाधिक चालना मिळेल, असे सांगितले. सरिता सोनवणे यांनी यंदा या उपक्रमात मनापच्या ३२ शाळाच सहभागी झाल्या असल्या तरी पुढील वर्षापासून सर्व ९० शाळा सहभागी होणार असल्याचे नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक