शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

Sanjay Raut: राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर; शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 13:11 IST

Sanjay Raut: राज्यातील फुटीर आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे अशा स्थितीत राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर आहे असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक- राज्यातील फुटीर आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे अशा स्थितीत राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर आहे असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केला खासदार राऊत हे नाशिकच्या  तीन दिवसीय दौऱ्यावर असून काल रात्री त्यांचे आगमन झालं. आज सकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा हा पक्ष शिवसेनेशी समोरून लढू शकत नाही त्यामुळे शिवसेनेचे आमदार फोडून हेच शिवसेनेच्याच विरोधात लढाईचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी यावेळी केला.

भाजपा विषयी आता आपण बोलत नाहीत कारण त्यांना शिवसेनेच्या विरोधात बोलण्यासाठी नवीन 40 भोंगे  फाटाफुटीतून मिळाले आहेत असेही राऊत म्हणाले. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आपण नाशिकमध्ये आलो असून नाशिकचे शिवसेनेचे सदैव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होते आणि त्यांच्या पाठीशीच राहतील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

 मुंबई वेगळी करण्याचे आणि तोडण्याचे भाजपाचे स्वप्न शिवसेना असेपर्यंत पूर्ण होणार नाही त्यामुळे भाजपकडून जाणीवपूर्वक शिवसेनेला संपवण्याचा कट केला जात आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना