शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

“आघाडीमध्ये पारदर्शकता होती म्हणून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:57 IST

सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वत: घेतली होती.

नाशिक: राष्ट्रवादी नेते आणि उपमख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि  भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राजकारणात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेले मोठे गौप्यस्फोट. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये पारदर्शकता होती. सर्वांना गोष्टी माहिती होत्या. म्हणूनच अजित पवारांसह अन्य आमदार परत आले आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते. ज्या वेळी महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करायची होती त्यावेळी सत्तेच्या नशेमुळे भाजप कोणाबरोबरही जाऊन सत्ता स्थापन करण्यास तयार होती. मग त्यांनी शरद पवारांना ही ऑफर दिली होती. हे आम्हाला सर्वांना माहिती होते. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन करणार आहेत. एवढेच स्पष्ट पारदर्शकता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होती. कारण आम्हाला सत्ता स्थापन करायची होती आणि सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वतः घेतली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला. 

शरद पवार सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे

ज्याअर्थी शरद पवार हे सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे. कारण त्यावेळी भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की, काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम सुरु होता. आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण काय बोलते, कुणाला भेटते याबाबत पारदर्शकता होती. याबाबत भाजपाला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती. म्हणूनच अजित पवारांसोबत सगळे आमदार परत आले, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊत