शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

उन्हाळी कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:21 IST

कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.

ठळक मुद्देहवालदिल : अर्धा चाळीत सडला तर उरलेल्याला कवडीमोल भाव

वटार : कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला; मात्र कांद्याचे बाजार कोसळल्याने आता कांदा सरासरी ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी होत आहे. या विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.फेब्रुवारी-मार्च महिन्यात साठविलेला कांदा नऊ महिन्यांनी शेतकरी बाजारात विक्र ीसाठी आणत आहे. या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणित बिघडविले असल्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी याच कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळाला होता. यंदा सद्यस्थितीत सरासरी ३०० ते ४०० रु पये दर कांद्याला मिळत आहे.गेल्या वर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला. यंदा पन्नास टक्के उत्पादन घटलेले असताना लाल कांद्याच्या दरानेदेखील माना टाकल्या आहेत.साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावफेब्रुवारी-मार्च महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मार्च महिन्यात कांद्याला सर्वसाधारण भाव हा ७०० ते ८०० रु पये इतका होता. आज हा कांदा बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे. त्याला ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावाने विकला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याला उच्चांकी भाव चार हजाररु पयापर्यंत गेला होता.यंदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक केली होती; मात्र सरकारने शेतकºयांना अच्छे दिन दाखवत याच दिवसात चार हजार रु पये जाणारा कांदा चारशे रु पयांवर आणून ठेवल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. चालू वर्षी फक्त आॅक्टोबर महिन्यात फक्त तीनच दिवस कांद्याला सरासरी दोन हजारपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला; मात्र त्यानंतर आजपर्यंत कांद्याच्या दरात एका पैशाचीसुद्धा वाढ झाली नसून कसमादेतील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ३०० ते ४०० रु पयांचा दर मिळत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदाFarmerशेतकरी