शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उन्हाळी कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:21 IST

कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.

ठळक मुद्देहवालदिल : अर्धा चाळीत सडला तर उरलेल्याला कवडीमोल भाव

वटार : कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला; मात्र कांद्याचे बाजार कोसळल्याने आता कांदा सरासरी ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी होत आहे. या विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.फेब्रुवारी-मार्च महिन्यात साठविलेला कांदा नऊ महिन्यांनी शेतकरी बाजारात विक्र ीसाठी आणत आहे. या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणित बिघडविले असल्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी याच कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळाला होता. यंदा सद्यस्थितीत सरासरी ३०० ते ४०० रु पये दर कांद्याला मिळत आहे.गेल्या वर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला. यंदा पन्नास टक्के उत्पादन घटलेले असताना लाल कांद्याच्या दरानेदेखील माना टाकल्या आहेत.साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावफेब्रुवारी-मार्च महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मार्च महिन्यात कांद्याला सर्वसाधारण भाव हा ७०० ते ८०० रु पये इतका होता. आज हा कांदा बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे. त्याला ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावाने विकला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याला उच्चांकी भाव चार हजाररु पयापर्यंत गेला होता.यंदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक केली होती; मात्र सरकारने शेतकºयांना अच्छे दिन दाखवत याच दिवसात चार हजार रु पये जाणारा कांदा चारशे रु पयांवर आणून ठेवल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. चालू वर्षी फक्त आॅक्टोबर महिन्यात फक्त तीनच दिवस कांद्याला सरासरी दोन हजारपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला; मात्र त्यानंतर आजपर्यंत कांद्याच्या दरात एका पैशाचीसुद्धा वाढ झाली नसून कसमादेतील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ३०० ते ४०० रु पयांचा दर मिळत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदाFarmerशेतकरी