शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

साल्हेर घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:56 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या घाट किटंगच्या सदोष कामामुळे वारंवार दरड कोसळून पश्चिम भागाच्या आदिवासी गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत आहे. लाखो रु पये खर्चून केलेला हा घाट रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून सदर रस्त्याच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

बागलाण तालुक्यातील पश्चिम भागाच्या आदिवासींचा विकास व्हावा म्हणून शासनाने रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या वर्षी वाघंबा साल्हेर दरम्यानच्या साल्हेर घाट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते.या कामासाठी दोन कोटीहून अधिक निधी मंजूर होऊन गेल्या वर्षी कामाला सुरु वात करण्यात आली. या कामामुळे तब्बल चार ते पाच महिने हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. या कामामुळे आदिवासींना अक्षरश: पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती. दरम्यान, काम पूर्ण झाले म्हणून या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र घाट रस्त्याच्या सदोष कामामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून वारंवार दरड कोसळून वाहतुकीला अडथळा होत आहे. या घाट रस्त्यामुळे गुजरात व कळवण तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग ठरणार आहे. या घाट रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत शासनाने दहा कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे. दरवर्षी एकाच कामाच्या दोन दोन वेळा निविदा देखील काढल्या जातात किरकोळ नावात बदल करून निधी लाटला जात असल्याचे दस्तुरखुद्द ठेकेदार वर्तुळातच उघडपणे चर्चा केली जात आहे. या चर्चेमुळे पुन्हा एकदा अधिकारी , पुढारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती चव्हाट्यावर आली आहे.इन्फोसाल्हेर किल्ला सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. किल्ला व परिसर पाहण्यासाठी कोल्हापूर ,पुणे ,सातारा ,मुंबई ,ठाणे , औरंगाबाद, नगर, सोलापूर, जळगाव, धुळे या जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेशमधील पर्यटक मोठ्या संख्यने साल्हेर येथे हजेरी लावतात.साल्हेर येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून वारंवार या घाट रस्त्यात दरड कोसळत असल्यामुळे सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वाहून आलेली माती, त्यात अचानक कोसळलेल्या दगड-गोट्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.संबधित विभागाने कामाची चौकशी करावी अशी मागणी आदिवासी भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक