शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाश्चात्त्य संस्कृतीच्या अतिरेकाने नाती हरवली : रामतीर्थंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:43 IST

पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिरेकामुळे धकाधकीच्या जीवनात नाती हरवत चालली आहे. नाती विखुरली गेल्याने विश्वास कुणावर ठेवावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे नात्यांवर बोलण्याची आज वेळ आली असल्याचे प्रतिपादन अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी केले.

नाशिक : पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिरेकामुळे धकाधकीच्या जीवनात नाती हरवत चालली आहे. नाती विखुरली गेल्याने विश्वास कुणावर ठेवावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे नात्यांवर बोलण्याची आज वेळ आली असल्याचे प्रतिपादन अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी केले.अत्रेयनंदन कला क्र ीडा सामाजिक संस्था व क्षितिज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्ताने आयोजित तीनदिवसीय व्याख्यानमालेचे दत्त मंदिर परिसर, मीनाताई ठाकरे शाळेमागे कामटवाडा येथे अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी ‘नाती जपूया’ या विषयावर गुंफले त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी अत्रेयनंदन कला क्र ीडा सामाजिक संस्था व क्षितिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र फड, नगरसेवक सुवर्णा मटाले, छाया देवांगे, दीपक दातीर, गोविंद घुगे, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, पोलीस निरीक्षक लोहकरे, शोभा फड, सुभाष जांगडा, नितीन भोसले, भरत पटेल, के. के. देशपांडे, अमोल वाघ, योगेश मांडे आदी उपस्थित होते.यावेळी अपर्णाताई रामतीर्थंकर म्हणाल्या की, टीव्ही आणि मोबाइल या माध्यमातून मुलांवर वाईट परिणाम जास्त होतात. कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षणाबरोबर नाती अतिशय महत्त्वाची आहे. शिक्षणाबरोबर घरही तेवढेच महत्त्वाचे आहे. संस्कारांचे कवच घट्ट करून मुलांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेविका सुवर्णा मटाले, पोलीस निरीक्षक लोहकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी अपर्णाताई रामतीर्थंकर यांच्या हस्ते महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अनिल चांदवडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक राजेंद्र फड यांनी केले. गौरव चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक