शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
4
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
5
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
6
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
7
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
8
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
9
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
10
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
11
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
12
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
13
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
16
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
17
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
18
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
19
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
20
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या काढणीची लगीनघाई, खरड छाटणीला मजुरांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:04 IST

शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे.

ठळक मुद्देशिरवाडे वणी परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे.गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना रोगाने मात केली असून, त्याचा परिणाम शेतकरी वर्गापासून व्यावसायिक, व्यापारीवर्ग, मजूरवर्ग व इतर सर्वच उद्योगधंद्यांवर झाला आहे. परंतु, त्याच्या यातना बहुतांशी शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर भोगाव्या लागल्या आहेत. द्राक्षे हे प्रमुख नगदी पीक जरी असले तरी पहिल्या टप्प्यातील द्राक्षाला सरासरी योग्य भाव मिळाला असून, दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील कांदे व द्राक्षे मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ आल्यामुळे शेती व्यवसाय आता तरी आतबट्ट्याचा खेळ झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

पाच वर्षांपूर्वी द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात होते. परंतु, नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवकाळी पाऊस, फयान, रोगराईचा सामना, व्यापारी पलायन, कवडीमोल मिळत असलेला द्राक्षाचा भाव या गोष्टींमुळे ते आता दिवसेंदिवस बेभरवशाचे पीक ठरत आहे. निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाचे भाव स्थिर नसल्यामुळे लोकल विक्री करणाऱ्या द्राक्षाचा कचऱ्याप्रमाणे भाव होत असल्यामुळे ह्यकही खुशी, कही गमह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

द्राक्षाच्या पिकाला वर्षभर टप्प्याटप्प्याने खर्च करावा लागत असतो. प्रति वर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे उत्पादन खर्च वजा जाता झीरो बजेटमध्ये आले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये द्राक्ष बागांची छाटणी कमी झाली असली तरी पहिल्या टप्प्यातील काढणी झालेल्या द्राक्ष वेलींना खरड छाटणी पूर्वमशागत करणे, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्यासाठी पाचटाचे मल्चिंग करणे, खते व पाणी देऊन पुढील वर्षाच्या हंगामातील पीक घेण्यासाठी वेलींची खरड छाटणी करून माल काडी तयार करणे गरजेचे असते.

द्राक्ष वेलींना पाणी देण्यासाठी वीजबिल वसुलीच्या धडक मोहिमेमुळे ठिकठिकाणी वीज रोहित्र खंडित केले जात असताना तसेच लोडशेडिंगमुळे वेलींना पाणी देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष वेलींच्या खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील द्राक्षबागांची काढणी, कांदे, हरभरे, गहू काढणे, द्राक्षबागांची छाटणी पूर्व मशागती करणे ओझरखेड कालव्याला पाणी सोडले असल्यामुळे पाणी भरणे आदी सर्व कामांची एकच धांदल उडाली असून, मजुरांची टंचाई भासत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी