शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भाग अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 22:33 IST

जानोरी : ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पथदीपांची बिले थकल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात अंधार पसरला असून, शासनाने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने बिले भरावी, असा आदेश काढून ग्रामपंचायतींपुढे मोठा पेचप्रसंग उभा केला आहे. त्यामुळे कमी बिल येण्यासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद व आमदार निधीतून दिलेले हायमास्ट बंद करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची थकबाकी : वीज पुरवठा खंडित केल्याने गैरसोय

जानोरी : ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पथदीपांची बिले थकल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात अंधार पसरला असून, शासनाने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने बिले भरावी, असा आदेश काढून ग्रामपंचायतींपुढे मोठा पेचप्रसंग उभा केला आहे. त्यामुळे कमी बिल येण्यासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद व आमदार निधीतून दिलेले हायमास्ट बंद करण्याची चर्चा सुरू झाली आहे.ग्रामीण भागात असलेल्या पथदिव्यांची बिले १९८४ पासून जिल्हा परिषदेमार्फत भरली जात होती. परंतु, शासनाने नुकताच अध्यादेश काढला असून, त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे, ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांची येणारी वीज बिलांची देयके ग्रामपंचायतीने त्यांना वर्ग झालेल्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावी, असे निर्देशित केले आहे. दिंडोरी तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायती या पेसा अंतर्गत येत असल्याने त्यांना शासनाकडून येणारा निधी प्रामुख्याने १५ वा वित्त आयोग व पेसा या दोन शीर्षकाखाली प्राप्त होतो. तालुक्यातील दोन ते तीन ग्रामपंचायती वगळता बाकीच्या सर्वच ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती ही गेल्या वर्षापासून बेताचीच आहे. दैनंदिन खर्च करताना ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत असतानाच शासनाने वीज बिलांचा चेंडू ग्रामपंचायतीच्या कोर्टात टाकून आपले हात झटकले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीतील कनेक्शन कट केल्याने ग्रामीण भागात अंधार पसरला आहे. अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांना घराबाहेर पडताना अंधारामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात जंगली श्वापदांची हल्ले व सर्पदंशाच्या घटनेत वाढ होत आहे.जि.प.नेच बिले भरावीतयाबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता प्रत्येक ग्रामपंचायतीची थकबाकी लाखांच्या घरात असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडित केल्याचे उत्तर मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले असून, जर ग्रामपंचायतीने ही बिले भरली तर ग्रामविकासासाठी निधी शिल्लक राहणार नसल्याचे अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचे म्हणणे आहे. शासनाने त्वरित पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत वीज बिले भरून ग्रामीण भागातील अंधार दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासelectricityवीज