शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये शुक्रवारपासून आरटीई प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:12 IST

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. ११)पासून पुन्हा सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत मुदत : लॉटरीत ४५४४ जागांसाठी ४२०८ विद्यार्थ्यांची निवड

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. ११)पासून पुन्हा सुरू होणार आहे.

आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४५४४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली असून, सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. सोडतीत राज्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यात नाशिकमधील ४२०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना लॉटरीत प्रवेशाची संधी मिळूनही कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे ठप्प झालेली प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार असून, या प्रवेश प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा, असे शिक्षण संचालकांनी म्हटले आहे.

दरम्यान, लॉटरीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची स्थितीजिल्ह्यातील शाळा - ४५०उपलब्ध जागा - ४५४४विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज - १३, ३३०निवड झालेले विद्यार्थी - ४२०८.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी