शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

४८० कोटींच्या रिंगरोडचा ‘नसता उपद्व्याप’

By admin | Updated: September 29, 2015 23:24 IST

ज्या कुंभपर्वासाठी अट्टहास, त्यालाच लागला गळफास

नाशिक : कधी कधी ‘नसती उठाठेव’ कामास येते; परंतु ‘नसता उपद्व्याप’ केला की त्याचा कसा फियास्को होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक महानगरपालिकेने साकारलेले अंतर्गत व बाह्य रिंगरोड होय. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक महानगरपालिकेने शासनाला सादर केलेल्या ११११ कोटी रुपयांच्या आराखड्यातील सुमारे ४८० कोटी रुपये म्हणजे जवळपास निम्मी रक्कम रस्त्यांच्या कामांवर खर्च केली. मात्र, प्रत्यक्षात पर्वणीकाळात नको त्या ठिकाणी केलेला रस्त्यांचा उपद्व्याप काही कामास आला नाही. अर्थात, महापालिकेच्या या पांढऱ्या हत्तीला खाकी वर्दीने बंदोबस्ताच्या नावाखाली जागोजागी जखडून ठेवल्याने ज्यासाठी केला होता अट्टहास तोच फसला गेल्याचे निदर्शनास आले. सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा तयार केला गेला तेव्हा नाशिक महापालिकेने आपला स्वतंत्र १०५० कोटींचा आराखडा केंद्र व राज्य सरकारला सादर केला होता. त्यानंतर वाढीव ६१ कोटींमुळे आराखडा ११११ कोटींवर जाऊन पोहोचला. त्यातील ७५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे ६८९ कोटी रुपये नाशिक महापालिकेला राज्य शासनाकडून प्राप्त होणार होते, तर उर्वरित २५ टक्के रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करायची होती. नाशिक महापालिकेच्या आराखड्यात प्रामुख्याने सर्वाधिक बजेट होते ते रस्त्यांचे. अंतर्गत व बाह्य रिंगरोड, केंद्रीय रस्त्यांचे व नदीपात्राकडे येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण यासाठी ४६२.५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित धरण्यात आला होता. सिंहस्थानिमित्त लाखोच्या संख्येने भाविक दाखल होतील तेव्हा भाविकांची वाहने बाहेरच्या बाहेरच बाह्य रिंगरोडने बाह्य वाहनतळांवर जातील. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडणार नाही. काही अंतर्गत रस्त्यांचाही वापर कुंभ पर्वणीकाळात भाविक मार्ग म्हणून करता येईल, असे सारे चित्र महानगरपालिकेने रंगवले आणि १०२ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यात १८.६० कि.मी. अंतर्गत रिंगरस्ते, २०.३० कि.मी. बाह्य रिंगरस्ते, ८ मीटर रुंदीचे २.८० कि.मी. मध्य रिंगरस्ते, ३९.७५ कि.मी. केंद्रीय रस्ते आणि २५.७४ कि.मी. नदीपात्राकडे येणारे व प्रशासकीय मार्गासाठी रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. याशिवाय नव्याने पाच पूलही साकारण्यात आले. त्यात गोदावरी नदीवर नांदूर नाका, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळ आणि वालदेवी नदीवर देवळाली गाव येथे समांतर पुलाची निर्मिती झाली. तर, नाशिक-टाकळी शिवरस्त्यावर आणि तपोवन लिंकरोडवर नवीन पुलाची उभारणी करण्यात आली. महानगरपालिकेने कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते आणि पुलांची उभारणी केली; परंतु प्रत्यक्ष पर्वणीकाळात या रस्त्यांचा किती वापर झाला, याची चिकित्सा आता होऊ लागली आहे. दि. २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अतिरेकी नियोजनाचा फटका महापालिकेने तयार केलेल्या रिंगरोडलाही बसला. पोलिसांनी बाह्य वाहनतळांवरच बाहेरगावाहून येणारी वाहने रोखल्याने रिंगरोडचा वापर झालाच नाही. पहिल्या पर्वणीला झालेल्या चुका नंतर दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीला सुधारण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला; परंतु बाह्य रिंगरोडचा काही प्रमाणातच वापर होऊ शकला. प्रामुख्याने, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या हद्दीत आणि शहराबाहेर उभारलेल्या बाह्य वाहनतळांवरच मुळात अपेक्षेपेक्षा कमी संख्येने खासगी वाहने आली. सदर वाहने रिंगरोडवर धावण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. जी काही वाहने धावली त्यात बव्हंशी पासधारक अथवा व्हीआयपी वाहनांचाच समावेश होता. पोलिसांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला भलेही वाहतुकीच्या नियोजनात शिथिलता आणण्याचा आव आणला असला तरी, ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे वाहने रिंगरोडवरून मोठ्या संख्येने धावताना दिसलीच नाहीत. कुंभपर्वणीला रेल्वे आणि एसटीनेच भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले. त्यामुळे, नाशिकरोड रेल्वेस्थानक ते काठेगल्ली-द्वारका हा मार्ग वगळता अन्य मार्गांवर वाहतुकीची वर्दळ दिसून आली नाही. जेथे महापालिकेची अत्यावश्यक सेवा मानल्या गेलेल्या घंटागाडीलाही खतप्रकल्प गाठता आला नाही तेथे अंतर्गत-बाह्य रिंगरोडवर खूप मोठ्या संख्येने वाहने धावली असतील, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.