शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

एकलहरे वीज केंद्रात साकारली रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:25 IST

नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील रोपवाटिकेत सुमारे सोळा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या या केंद्रात प्लॅस्टिकमुक्त केंद्र, शून्य कचरा प्रकल्प, शून्य गळती प्रकल्प, ऊर्जा व जलसंवर्धन असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

एकलहरे : नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील रोपवाटिकेत सुमारे सोळा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या या केंद्रात प्लॅस्टिकमुक्त केंद्र, शून्य कचरा प्रकल्प, शून्य गळती प्रकल्प, ऊर्जा व जलसंवर्धन असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शासनाने निर्धारित केलेले वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत.एकलहरे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजारो झाडे लावून हरितपट्टा निर्माण केला आहे. या वृक्षारोपणासाठी वनविभाग व सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेशिवाय खासगी रोपवाटिकेतून हजारो रोपे आणण्यात आली. परंतु यावर्षी जुलैमध्ये होणाºया वृक्षारोपणासाठी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली वसाहतीतील स्थापत्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अद्ययावत अशी रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. अशाप्रकारे महानिर्मितीमध्ये रोपवाटिकाद्वारे हजारो झाडांची रोपे तयार करण्यात आल्याचा पहिलाच प्रयोग आहे. माती, खत व पाण्याचे योग्य नियोजन यांचा सुंदर मेळ घालून व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घरी जमा केलेल्या अनेक फळांच्या बियांपासून स्थापत्य विभागाने रोपे तयार केली आहेत.या रोपवाटिकेमध्ये शेवगा ७९८६, विलायती चिंच १४१०, आंबा १८०, फणस १७३०, सीताफळ ७००, करंज १०६०, आंबट चिंच १५८०, जांभूळ ८००, इतर (बेल, बेहड, वड) ३००, गुलमोहर ६००, बहावा १५० अशी एकूण १६,४९६ रोपे तयार केली आहेत. ही रोपवाटिका स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता मनोहर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विवेक मोरे, प्राजक्ता घुले, सोमदत्त साठे, हरिष आहेर, संतोष येवले यांच्या अथक परिश्रमातून साकार झाली आहे.पर्यावरणाचा समतोलएकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे पर्यावरण संवर्धन केंद्र म्हणून महानिर्मिती-मध्ये आदर्श ठरत आहे. या केंद्रात प्लॅस्टिकमुक्ती, शून्य कचरा, शून्य गळती, ऊर्जा व जलसंवर्धन, वृक्षारोपण, विविध विभागांत उद्याने अशा अनेक उपक्रमांमुळे राज्यभरात या वीज केंद्राचे नाव झाले आहे. येत्या पावसाळ्यात विविध प्रकारची रोपे येथेच तयार करून वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी, कामगार व परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता,  एकलहरे वीजनिर्मिती केंद्र

टॅग्स :Nashikनाशिक