शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

रोल मॉडेल : कालव्यांना त्वरित पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

वाघाडचे राखीव पाणी सोडत नसल्याने संताप

दिंडोरी : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला उपक्र म म्हणून जागतिक पातळीवर दखल घेतला गेलेला वाघाड सिंचन प्रकल्प सिंचन व्यवस्थापनेचे रोल मॉडेल म्हणून सांगितला जात आहे. समन्यायी पाणीवाटप, पीकस्वातंत्र्य, घनमापनपद्धतीने पाणीवाटप, टेल ते हेड सिंचन, श्रमदानाने कालवा दुरुस्ती, शंभर टक्के पाणीपट्टी वसुली, आगावू पाणीपट्टी भरणा, काटकसरीने पाणीवापर या सूत्रांचे कटाक्षाने पालन आणि पाणीवापर संस्थांचा पारदर्शक व्यवहार यामुळेच हा प्रकल्प नावारूपास आलेला असताना यंदा मात्र या पाणीवाटप संस्थेच्या हक्काचे पाणी शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही सोडले जात नसल्याने पाणीवाटप संस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाघाड कालव्यांना त्वरित आवर्तन सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाणीवाटप महासंघाच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपाध्यक्ष सिंधूबाई नाठे, संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी, संचालक चंद्रकांत राजे, माजी अध्यक्ष शिवाजी पिंगळ यांनी दिला आहे.वाघाड प्रकल्पअंतर्गत झालेल्या पाणी नियोजनात संस्थेने यंदा दुष्काळी परिस्थितीचा विचार करत जास्तीचे पाणी वाट्याला येत असताना कमी पाणी घेण्याचे मान्य करत नियोजन झाले. यानुसार पाणीवापर संस्था यांना शासनाने धरणात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या प्रमाणात संस्थाना देय पाणी ६६० दलघफू कोट्यातून रब्बीचे ३०९ दलघफू पाणी घेतले तर उर्वरित ३५१ दलघफू पाणी शिल्लक असताना गेल्या दोन महिन्यापासून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विविध स्तरावर पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, आयुक्त, अधीक्षक अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूनही पाणी देण्याबाबत तोंडी अश्वासन दिले. परंतु आजपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने संभ्रम कायम ठेवला आहे. मध्यंतरी प्रशासनाने लोकप्रतिनिधी तसेच पाणीवापर संस्थांना विश्वासात न घेता वाघाड धरणातून अचानक पाणी पालखेड धरणात सोडले गेले. वरील सर्व संस्थांनी १० मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणावर जाऊन आंदोलन करून नदीला सोडलेले पाणी बंद करून वाघाड धरण रिकामे करण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडला. आज वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसा ठराव मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आला आहे असे संस्थेच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपअध्यक्षा सिंधूबाई नाठे, ताई वडजे, संचालक चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत वाघ, भास्करराव गायकवाड, मधुकर पवार, तुषार वसाळ, सुरेश घुमरे, प्रभाकर विधाते, प्रकाश नाठे, पुंजा शिंदे, विजय वडजे, भरत कावळे, सचिव बाळासाहेब कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)