शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

रोल मॉडेल : कालव्यांना त्वरित पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

वाघाडचे राखीव पाणी सोडत नसल्याने संताप

दिंडोरी : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला उपक्र म म्हणून जागतिक पातळीवर दखल घेतला गेलेला वाघाड सिंचन प्रकल्प सिंचन व्यवस्थापनेचे रोल मॉडेल म्हणून सांगितला जात आहे. समन्यायी पाणीवाटप, पीकस्वातंत्र्य, घनमापनपद्धतीने पाणीवाटप, टेल ते हेड सिंचन, श्रमदानाने कालवा दुरुस्ती, शंभर टक्के पाणीपट्टी वसुली, आगावू पाणीपट्टी भरणा, काटकसरीने पाणीवापर या सूत्रांचे कटाक्षाने पालन आणि पाणीवापर संस्थांचा पारदर्शक व्यवहार यामुळेच हा प्रकल्प नावारूपास आलेला असताना यंदा मात्र या पाणीवाटप संस्थेच्या हक्काचे पाणी शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही सोडले जात नसल्याने पाणीवाटप संस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाघाड कालव्यांना त्वरित आवर्तन सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाणीवाटप महासंघाच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपाध्यक्ष सिंधूबाई नाठे, संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी, संचालक चंद्रकांत राजे, माजी अध्यक्ष शिवाजी पिंगळ यांनी दिला आहे.वाघाड प्रकल्पअंतर्गत झालेल्या पाणी नियोजनात संस्थेने यंदा दुष्काळी परिस्थितीचा विचार करत जास्तीचे पाणी वाट्याला येत असताना कमी पाणी घेण्याचे मान्य करत नियोजन झाले. यानुसार पाणीवापर संस्था यांना शासनाने धरणात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या प्रमाणात संस्थाना देय पाणी ६६० दलघफू कोट्यातून रब्बीचे ३०९ दलघफू पाणी घेतले तर उर्वरित ३५१ दलघफू पाणी शिल्लक असताना गेल्या दोन महिन्यापासून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विविध स्तरावर पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, आयुक्त, अधीक्षक अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूनही पाणी देण्याबाबत तोंडी अश्वासन दिले. परंतु आजपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने संभ्रम कायम ठेवला आहे. मध्यंतरी प्रशासनाने लोकप्रतिनिधी तसेच पाणीवापर संस्थांना विश्वासात न घेता वाघाड धरणातून अचानक पाणी पालखेड धरणात सोडले गेले. वरील सर्व संस्थांनी १० मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणावर जाऊन आंदोलन करून नदीला सोडलेले पाणी बंद करून वाघाड धरण रिकामे करण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडला. आज वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसा ठराव मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आला आहे असे संस्थेच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपअध्यक्षा सिंधूबाई नाठे, ताई वडजे, संचालक चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत वाघ, भास्करराव गायकवाड, मधुकर पवार, तुषार वसाळ, सुरेश घुमरे, प्रभाकर विधाते, प्रकाश नाठे, पुंजा शिंदे, विजय वडजे, भरत कावळे, सचिव बाळासाहेब कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)