शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उंटवाडी परिसरातील रस्त्यांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:59 IST

नव्याने झपाट्याने विकसित होणाऱ्या उंटवाडी परिसरात विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले असून, परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. परिसरातील अनेक पथदीप बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे.

सिडको : नव्याने झपाट्याने विकसित होणाऱ्या उंटवाडी परिसरात विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले असून, परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. परिसरातील अनेक पथदीप बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.संततधार पावसाने परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्त्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले ैअसून, दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी कालिका उद्यान परिसर सोडला तर संपूर्ण रस्त्यावर चारच पथदीप सुरू आहेत. वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित लक्ष देत नाहीत.गेल्या तीन-चार दिवसांपासून कालिका पार्क, श्रीराम रो-हाऊस, साईराम रो-हाऊस, तिडकेनगर आदी परिसरातील पथदीप बंदच असतात. परिसरात भटक्या गायी व श्वानांची संख्याही मोठी आहे. रात्रीच्या वेळी श्वान मोठमोठ्याने भुंकत असल्याने व वाहनाचालकांवर धावून जात असल्याने रहिवाशांत कायम दहशत असते.कालिका पार्क, श्रीराम पार्क, साईराम परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, दुर्गंधी येत आहे. थंडीतापाच्या साथीने अनेक आबालवृद्धी आजारी आहेत. संबंधितांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मुख्य रस्त्यावर केवळ चारच पथदीप सुरू!कालिका गार्डनपासून ते नव्याने झालेल्या कमल ब्लॉसमपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर केवळ चारच पथदीप सुरू असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. काही रस्ते कॉँक्रीट झाले असले तरी ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. लोकप्रतिनिधी कधीच परिसरात फिरकत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी भटक्या गायी व श्वान बसलेले असतात. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांना रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच जावे लागते. याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.रस्ते, पथदीप बंद, भटकी जनावरे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. तक्रार करूनही कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे परिसरात अनेक समस्या तशाच आहेत. याबाबत मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात वारंवार तक्रार केली तरीही दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.- रहिवासी

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा