शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी

By admin | Updated: August 2, 2014 01:23 IST

केंद्रीय मंत्रालयाला अवगत : पाऊस थांबल्यास कार्यवाही

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्याची बाब केंद्रीय भूपृष्ट मंत्रालयाने गांभीर्याने घेतली असून, शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी व रस्त्याचे काम करणाऱ्या गॅमन इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्याठिकाणी डोंगरावरून कोसळणारा धबधबा आहे. त्याचे पाणी जमिनीखाली शिरून रस्ता खचल्याचा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे सततच्या पावसामुळे याच मार्गावर रस्ता खचला होता. त्यानंतर त्याची डागडुजी करण्यात आल्याने आता तो भाग व्यवस्थित असल्याची पुष्टीही या अधिकाऱ्यांनी जोडली. कसारा घाटात गुरुवारी दुपारी रस्ता खचल्याची बाब वाहनचालकांच्या निदर्शनास आल्याने हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन एका बाजूची वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्णातील माळीण येथे अशाच प्रकारे डोंगर खचून संपूर्ण गावच्या गाव नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वर्दळीच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग खचण्याच्या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाशी संपर्क साधून संचालक तावडे यांना त्याबाबतची माहिती दिली व केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली असता, तावडे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महामार्गाची पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खोडस्कर, गॅमन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन आदिंनी महामार्गाला भेट देऊन पाहणी केली. कसारा घाटात अजूनही पाऊस सुरू असल्याने खचलेल्या रस्त्याची डागडुजी तातडीने करणे शक्य नाही; परंतु पाऊस थांबल्यानंतर त्यातील भेगा भरून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. कसारा घाटात चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या स्वरूपात धबधबे असून, त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत असल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकतो, असा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे.