शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी

By admin | Updated: August 2, 2014 01:23 IST

केंद्रीय मंत्रालयाला अवगत : पाऊस थांबल्यास कार्यवाही

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्याची बाब केंद्रीय भूपृष्ट मंत्रालयाने गांभीर्याने घेतली असून, शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी व रस्त्याचे काम करणाऱ्या गॅमन इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्याठिकाणी डोंगरावरून कोसळणारा धबधबा आहे. त्याचे पाणी जमिनीखाली शिरून रस्ता खचल्याचा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे सततच्या पावसामुळे याच मार्गावर रस्ता खचला होता. त्यानंतर त्याची डागडुजी करण्यात आल्याने आता तो भाग व्यवस्थित असल्याची पुष्टीही या अधिकाऱ्यांनी जोडली. कसारा घाटात गुरुवारी दुपारी रस्ता खचल्याची बाब वाहनचालकांच्या निदर्शनास आल्याने हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन एका बाजूची वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्णातील माळीण येथे अशाच प्रकारे डोंगर खचून संपूर्ण गावच्या गाव नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वर्दळीच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग खचण्याच्या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाशी संपर्क साधून संचालक तावडे यांना त्याबाबतची माहिती दिली व केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली असता, तावडे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महामार्गाची पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खोडस्कर, गॅमन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन आदिंनी महामार्गाला भेट देऊन पाहणी केली. कसारा घाटात अजूनही पाऊस सुरू असल्याने खचलेल्या रस्त्याची डागडुजी तातडीने करणे शक्य नाही; परंतु पाऊस थांबल्यानंतर त्यातील भेगा भरून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. कसारा घाटात चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या स्वरूपात धबधबे असून, त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत असल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकतो, असा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे.