शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मेहेर ते अशोकस्तंभ रस्ता आज सायंकाळनंतर खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:01 IST

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे.

नाशिक : नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहेर ते अशोकस्तंभ हा रस्ता रविवारी (दि.१) सायंकाळपासून खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अवघ्या १.१ किलोमीटर रस्त्याचे पथदर्शी स्मार्ट रोडमध्ये रूपांतर करण्याचे काम २१ कोटी रुपयांत करण्यात येणार आहे. परंतु हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ३१ मार्च रोजी रस्त्याच्या कामाला दिलेली मुदतवाढ संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराला ३६ हजार रुपये प्रतिदिन दंड करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा दंड करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने ३१ आॅगस्टपर्यंत करण्यात रस्ता खुला होईल, असे सांगितले जात होते. परंतु काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. संबंधित ठेकेदारास १६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात आले असले तरी स्मार्ट सिटी कंपनीने त्याचा इन्कार केला आहे. ठेकेदाराची मुदत ३१ मार्च रोजीच संपली असून, आता केवळ लवकरातकॉँक्रिटरोडवर डांबरीकरण... याला म्हणतात ‘स्मार्ट’त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा मार्ग तातडीने खुला करावा यासाठी नागरिक सतत मागणी करीत आहे. त्यातच रखडलेल्या या मार्गावरूनच गणेशोत्सव मिरवणूक जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मेहेर सिग्नलजवळ काँक्रिटीकरणावर चक्क डांबर टाकून काम करण्यात आले असून, त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात, सदरचे काम बाकी असून, रस्त्यावर खड्डे पडल्याने गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकण्यात आल्यचा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी