शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिलांच्या डोक्यावर पुन्हा आली सरपणाची मोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 20:50 IST

सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे.

ठळक मुद्देमोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून गॅसवरील स्वयंपाक हद्दपार होत आहे.

सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे.ग्रामीण भागात दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून गॅसवरील स्वयंपाक हद्दपार होत आहे.रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन मिळणे बंद झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ह्यउज्ज्वलाह्ण योजना आली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे जवळपास सव्वासात लाख ह्यउज्ज्वलाह्ण पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात१२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाट वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्यात आली. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे पुन्हा सरपणाची ह्यचूलह्णच बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला. सध्या गॅस सिलिंडरचा दर १००० रुपयेपर्यंत झाला आहे. हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.दिवसाला दोनशे रुपये रोज मिळतो, त्यात उन्हाळा कडक असल्यामुळे हाताला काम मिळत नाही, त्यामुळे पैसे येणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत १ हजार ३० रुपये खर्च करणे सामान्य कुटुंबाला परवडत नसल्याने शेताच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.- सुनीता कमानकर, गृहिणी, भेंडाळी.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासGovernmentसरकार