शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

ऋषी कपूर यांची नाशिकमधील धर्मस्थळांवरही श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:22 IST

नाशिक : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नाशिकमधील चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

नाशिक : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नाशिकमधील चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी आपल्या चॉकलेट हिरोच्या सोशल मीडियावर आठवणी जागवल्या. ऋषी कपूर हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने नाशिकमध्ये चित्रीकरणा व्यतिरिक्तही येऊन गेले आहेत. विशेषत: त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर नाशिकरोड येथील अण्णा गणपती मंदिरातही त्यांनी भेट दिली होती.गेल्या दोन दिवसांत बॉलिवूडने दोन मोठे स्टार गमावले आहेत. इरफान खान यांच्या पाठोपाठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (दि.३०) सकाळी निधन झाले. त्यामुळे चाहत्यांंना मोठा धक्का बसला. ऋषी कपूर यांच्या काळ जागवणारी आणि त्यांना चॉकलेट हिरो मानणारी एक पिढी आहे, त्या साऱ्यांनाच ऋषी कपूर यांचे जाणे धक्कादायक ठरले आहे. सकाळी या घटनेनंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, फाळके फिल्म सोसायटीचे मुनीराम अग्रवाल यांनी २००० मधील आठवण जागवली. नाशिक ही चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी असल्याने नाशिकमध्ये आलेल्या प्रत्येकाला सोसायटीच्या वतीने फाळके यांची प्रतिमा भेट दिली जाते. ‘कुछ खट्टी कुछ मिठी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ऋषी कपूर तसेच अभिनेते सुनील शेट्टी आणि काजोल हे नाशिकमधील तारांकित हॉटेलमध्ये उतरल्याचे कळल्यानंतर सोसायटीच्या वतीने त्यांना प्रतिमा देण्यात आली. यावेळी अंबडकर (स्व.) प्रकाश काळे आदी उपस्थित होते.ऋषी कपूर हे नाशिकनजीक असलेल्या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येऊन गेले आहेत. तसेच सुमारे दीड वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते. त्यानंतर नाशिकरोड येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्ध पीठम येथे त्यांनी भेट दिली. येथील गणरायाच्या विशाल मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथील नवग्रह मंदिरात मंगळ ग्रहाची दोन तास पूजा केली होती, असे प. पू. अण्णा गुरुजी यांनी सांगितले.---------अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर आज लगेचच ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बालवयात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ऋषी कपूर यांनी शेवटपर्यंत आपल्या अभिनयातून चित्रपट रसिकांची मने जिंकली. चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान असून, ऋषी कपूर याच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक