शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्याच्या तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:32 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ऊन आणि गारव्याचा खेळ आता संपला असून, तालुक्याच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत गेले आहे. वाढत्या उन्हाने वातावरणातील उष्माही वाढू लागला आहे.

येवला : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ऊन आणि गारव्याचा खेळ आता संपला असून, तालुक्याच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत गेले आहे. वाढत्या उन्हाने वातावरणातील उष्माही वाढू लागला आहे. त्यामुळे मार्च अखेर वा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून येवलेकरांना उन्हाचा कहर सहन करावा लागणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून, घराबाहेर न पडण्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली आहे.वाढत्या उन्हामुळे रस्त्यावरील शुकशुकाट आणखी वाढत जाणार असून, शीतपेयांना मागणी वाढली आहे.मार्चचा पहिला दिवसाचा अपवाद वगळता मागील वर्षी संपूर्ण महिना ‘हॉट’ राहिला होता. यावर्षी मात्र स्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे चित्र होते; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलले असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान निरीक्षक केंद्राच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. मंगळवारी (दि.१७) शहराचे कमाल तापमान ३५.८, तर किमान तापमान १७.४ अंश इतके नोंदविले गेले. मंगळवारी दिवसभर नागरिक घामाघूम झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान