शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:07 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कत राहण्यास सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत संततधार। धरणे ओव्हरफ्लो; पर्यटकांना धरण क्षेत्रात जाण्यास मज्जाव

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कत राहण्यास सांगण्यात आले आहे.भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंदे दुमालाचे सरपंच गणपत जाधव यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिसांना सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील घटनांवर लक्ष ठेवले जात आहे.तालुक्यात १२ तासांत २२१ मिमी पाऊस पडला असून, संततधार सुरूच आहे. आतापर्यंत पडलेल्या ३०५२ मिमी पावसाने नद्या-नाले, धरणे भरली आहेत. शनिवारअखेर ९१.७९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. कोणत्याही क्षणी इगतपुरी तालुक्यात पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.अनेक रस्त्यांवरील पुलांवरपाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक आणि पर्यटकांची वाहने पोलिसांकडून वळविण्यात आली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणीसाचून राहिले आहे. काहीठिकाणी झाडे पडल्याचे समजते. अतिपावसामुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.अपर वैतरणा ओव्हरफ्लोमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अपर वैतरणा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असून, ९२०० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अपर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असून, मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.पाणी वाहत असल्यास वाहने पाण्यात घालू नये. पर्यटकांना वाहत्या पाणी परिसरात बंदी करण्यात आली आहे. विजेच्या खांबांना आणि उपकरणांना स्पर्श करू नये. धुक्यात वाहनांचे लाइट आणि इंडिकेटर सुरू करावे. आपत्कालीन प्रसंगासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाची मदत घ्यावी.- वंदना खरमाळे-मांडगे,तहसीलदार, इगतपुरी