शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन अधिकार्‍यांनी घेतला शैक्षणिक कामाचा आढावा

By admin | Updated: May 9, 2014 23:45 IST

टाकळी : गेल्या शैक्षणिक वर्षात शाळांनी केलेले कामकाज, राबविलेले उपक्रम आणि पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाबाबत प्रशासन अधिकार्‍यांनी मनपा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केेले. शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रम आणि वार्षिक नियोजनाबाबत मुख्याध्याकांनी दक्ष राहाण्याच्या सूचना यावेळी प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी दिल्या.

टाकळी : गेल्या शैक्षणिक वर्षात शाळांनी केलेले कामकाज, राबविलेले उपक्रम आणि पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाबाबत प्रशासन अधिकार्‍यांनी मनपा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केेले. शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रम आणि वार्षिक नियोजनाबाबत मुख्याध्याकांनी दक्ष राहाण्याच्या सूचना यावेळी प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी दिल्या. पलुस्कर सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पालिकेच्या १२७ शाळांमधील मुख्याध्यापक उपस्थित होते. ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार शाळांनी योगासने, एकच ध्यास, स्वच्छता, कार्यानुभव, छंदवर्ग, कराटे, वारली, रांगोळी, श्रमदान, मेहंदी, चित्र रंगविणे आदि उपक्रम कसे राबविले याची माहिती यावेळी प्रशासन अधिकार्‍यांनी घेतली. यावेळी काही शाळांनी राबविलेल्या उपक्रमाचे पॉवर प्रेझेंटेशन करून माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचेही दाखवून दिले. यावेळी मार्गदर्शन करताना कुंवर म्हणाल्या की, समाजासमोर शाळेचे चांगले चित्र निर्माण केले पाहिजे. त्यासाठी चांगल्या उपक्रमाची आणि कार्यक्रमाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचप्रमाणे ई-लर्निंगचा वापर महपालिकांच्या शाळेत होत असल्याची माहितीही समाजापर्यंत पोहचविण्याचे काम मुख्याध्यापकांनी करावे, असेही त्यांनी सांगितले. शाळांना देण्यात आलेल्या संगणक व प्रोजेक्टरच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अपेक्षित असून त्याबाबचे परिपत्रक संकेतस्थळावर असल्याचे यावेळी मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. मध्यान्ह भोजन उपक्रम राबविताना काळजी घ्यावी, तांदूळ योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवाव, खिचडी आगोदर तपासली जावी अशा सूचना यावेळी महापलिकेच्या वतीने देण्यात आल्या. (वार्ताहर)पटनेांदणी अभियानमनपा शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी १ ते ७ मे दरम्यान राबविलेल्या पटनोंदणीची माहिती यावेळी घेण्यात आली. घरोघरी गेल्यानंतर शिक्षकांना आलेला अनुभव काही शिक्षकांनी कथन केला. त्यातून काही विदारक बाबीही समोर आल्या. विद्यार्थी कुठून आला, कसा आला याची माहिती शिक्षकांना होत असल्याने त्याच्यासाठी काय करावे हे जवळून समजल्याचे काही शिक्षकांनी बोलून दाखविले. शाळाबा‘ विद्यार्थी शाळेच्या परिसरात आढळून आला तर त्याची जबाबदारी संबंधित शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांनी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.