शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
5
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
6
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
7
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
8
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
9
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
10
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
11
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
12
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
13
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
14
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
15
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
16
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
17
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
18
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
19
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
20
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष

वसुली अधिकाऱ्यांना गावबंदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:28 AM

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकरी बांधवांकडून कर्ज वसूल व्हावे यासाठी शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. येत्या दि. ३० व ३१ रोजी जिल्ह्णातील दुष्काळी भागातील काही गावांतील लिलाव प्रक्रिया होणार असून, या प्रकाराला उत्तर देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात शेतजमिनी लिलाव प्रक्रिया हाणून पाडत कर्जवसुलीसाठी येणाºया अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याबरोबरच वेळप्रसंगी घेरावदेखील घातला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

पंचवटी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकरी बांधवांकडून कर्ज वसूल व्हावे यासाठी शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. येत्या दि. ३० व ३१ रोजी जिल्ह्णातील दुष्काळी भागातील काही गावांतील लिलाव प्रक्रिया होणार असून, या प्रकाराला उत्तर देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात शेतजमिनी लिलाव प्रक्रिया हाणून पाडत कर्जवसुलीसाठी येणाºया अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याबरोबरच वेळप्रसंगी घेरावदेखील घातला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.बाजार समितीत या संदर्भात शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद घेतली. ते पुढे म्हणाले, सध्या शेतकºयांनी पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव नाही, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यापेक्षा सरकार अजून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. जिल्हा बँकेने केवळ शेतकरी नव्हे तर साखर कारखाने तसेच संचालक मंडळाच्या अनेक नातेवाइकांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. बँकेने त्यांच्याकडून वसुली करायचे सोडून शेतकरी बांधवांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे हे अत्यंत चुकीचे आहे. जोपावेतो सातबारा कोरा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची सुरुवात नाशिक जिल्ह्णातून केली जाणार असून, वेळप्रसंगी बँकेचे अध्यक्ष, संचालक यांच्या घरासमोर बिºहाडसह आंदोलन करत जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार वामनराव चटप, स्मिता नरोडे, अर्जुन बोराडे, देवीदास पवार, विष्णू ताकाटे, भानुदास ढिकले, डॉ.निर्मला जगताप, भास्कर सोनवणे, मधुकर हांबरे आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.बँकांनी शासनाकडून कर्ज वसुली करावीच्शेतकरी शेती देशासाठी करतो बँकेचे कर्ज घेऊन शेतकरी शेती पिकवितो. परंतु त्या शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळतो दोष शेतकºयांचा नाही तर तो विद्यमान सरकारचा आहे. त्यामुळे शेतकºयांच्या जमिनीचे लिलाव करणाºया बँकांनी कर्जवसुली सरकारकडून करायला पाहिजे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र