शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

वसुली अधिकाऱ्यांना गावबंदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:29 IST

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकरी बांधवांकडून कर्ज वसूल व्हावे यासाठी शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. येत्या दि. ३० व ३१ रोजी जिल्ह्णातील दुष्काळी भागातील काही गावांतील लिलाव प्रक्रिया होणार असून, या प्रकाराला उत्तर देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात शेतजमिनी लिलाव प्रक्रिया हाणून पाडत कर्जवसुलीसाठी येणाºया अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याबरोबरच वेळप्रसंगी घेरावदेखील घातला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

पंचवटी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकरी बांधवांकडून कर्ज वसूल व्हावे यासाठी शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. येत्या दि. ३० व ३१ रोजी जिल्ह्णातील दुष्काळी भागातील काही गावांतील लिलाव प्रक्रिया होणार असून, या प्रकाराला उत्तर देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात शेतजमिनी लिलाव प्रक्रिया हाणून पाडत कर्जवसुलीसाठी येणाºया अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याबरोबरच वेळप्रसंगी घेरावदेखील घातला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.बाजार समितीत या संदर्भात शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद घेतली. ते पुढे म्हणाले, सध्या शेतकºयांनी पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव नाही, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यापेक्षा सरकार अजून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. जिल्हा बँकेने केवळ शेतकरी नव्हे तर साखर कारखाने तसेच संचालक मंडळाच्या अनेक नातेवाइकांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. बँकेने त्यांच्याकडून वसुली करायचे सोडून शेतकरी बांधवांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे हे अत्यंत चुकीचे आहे. जोपावेतो सातबारा कोरा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची सुरुवात नाशिक जिल्ह्णातून केली जाणार असून, वेळप्रसंगी बँकेचे अध्यक्ष, संचालक यांच्या घरासमोर बिºहाडसह आंदोलन करत जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार वामनराव चटप, स्मिता नरोडे, अर्जुन बोराडे, देवीदास पवार, विष्णू ताकाटे, भानुदास ढिकले, डॉ.निर्मला जगताप, भास्कर सोनवणे, मधुकर हांबरे आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.बँकांनी शासनाकडून कर्ज वसुली करावीच्शेतकरी शेती देशासाठी करतो बँकेचे कर्ज घेऊन शेतकरी शेती पिकवितो. परंतु त्या शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळतो दोष शेतकºयांचा नाही तर तो विद्यमान सरकारचा आहे. त्यामुळे शेतकºयांच्या जमिनीचे लिलाव करणाºया बँकांनी कर्जवसुली सरकारकडून करायला पाहिजे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र