शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

अमृतकाळात सूड, बदलाचे राजकारण: यंत्रणा सत्ताधाऱ्यांची गुलाम- संजय राऊत

By श्याम बागुल | Updated: March 24, 2023 19:22 IST

सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होते.

नाशिक : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठीच न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. गांधी यांच्या वक्तव्यांनी मोदी यांची बदनामी झाली असेल तर मोदी यांनी खटला दाखल करावयास हवा होता. मात्र, चौथी पार्टी खटला दाखल करते व सुरत न्यायालय यावर निर्णय देते, हे पाहता सर्व यंत्रणांचा अमृतकाळात सूड व बदला घेण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मालेगाव येथे रवाना होण्यासाठी खासदार राऊत यांचे शुक्रवारी (दि. २४) नाशकात काही काळ आगमन झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. न्यायालय, ईडी, सीबीआय याच्यावर किती विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.

सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होत असल्याचे सांगून राऊत यांनी या यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल चौदा पक्षांनी याचिका दाखल केली आहे. या यंत्रणा फक्त सत्ताधाऱ्यांच्या राजकीय विरोधकांच्या चुका शोधतात व कारवाया करून दबाव आणतात, पक्ष फोडतात व सरकार पाडतात एवढेच काम करीत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी