शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

अमृतकाळात सूड, बदलाचे राजकारण: यंत्रणा सत्ताधाऱ्यांची गुलाम- संजय राऊत

By श्याम बागुल | Updated: March 24, 2023 19:22 IST

सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होते.

नाशिक : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठीच न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. गांधी यांच्या वक्तव्यांनी मोदी यांची बदनामी झाली असेल तर मोदी यांनी खटला दाखल करावयास हवा होता. मात्र, चौथी पार्टी खटला दाखल करते व सुरत न्यायालय यावर निर्णय देते, हे पाहता सर्व यंत्रणांचा अमृतकाळात सूड व बदला घेण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मालेगाव येथे रवाना होण्यासाठी खासदार राऊत यांचे शुक्रवारी (दि. २४) नाशकात काही काळ आगमन झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. न्यायालय, ईडी, सीबीआय याच्यावर किती विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.

सगळ्या यंत्रणा हे एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करीत असल्याचे सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट होत असल्याचे सांगून राऊत यांनी या यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल चौदा पक्षांनी याचिका दाखल केली आहे. या यंत्रणा फक्त सत्ताधाऱ्यांच्या राजकीय विरोधकांच्या चुका शोधतात व कारवाया करून दबाव आणतात, पक्ष फोडतात व सरकार पाडतात एवढेच काम करीत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी