शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

परतीच्या पावसाने द्राक्षबागांना फटका, भाजीपाला भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:27 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग दहा दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग दहा दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा डाऊनी, भुरी, कुज, गळ, या रोगांनी शेतकऱ्यांच्या हातातुन गेल्याने लाखो रु पये खर्च करून द्राक्ष बागा लावलेला शेतकरी धास्तावला आहे तर सोयाबीन पीक शेतात उभे असल्याने अतिपावसाने उभ्या झाडाच्या शेंगातील दाण्यांना कोंब फुटू लागले आहे. भाजीपाला भुईसपाट झाला आहेयंदा सुरवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने द्राक्ष हंगाम जोरात राहील अशी शक्यता वर्तवली जात होती शेतकर्यांनी वेळेवर छाटणी केली, फेल काढणे , शेंडा मारणे, डिपिंग करणे अशी सर्व कामे सुरळीत पार पडली. ८० टक्के बागा फुलोरा, आणि मनी सेट स्टेजमध्ये आल्या होत्या. अशा काळात सिंचनाद्वारे देणारे पाणी सुद्धा बंद करावे लागते जास्त प्रमाणात पाणी झाले तर मनी गळ आणि कुज होते घड रिंग करतात. त्यात पाणी साठलं जाते आणि साठलेल्या पाण्याने कुज येऊन केवळ घडाचे दांड शिल्लक राहतात. या अपरीपक्व काळात बाग टिकविणे मोठे कसरतीचे काम असते याच दरम्यान जास्त बागा आहे. खूप पाऊस पडला त्यामुळे झाडाला एकही पाण्याचा थेंब नको असतो त्या काळात बागा पाण्याने तुडुंब भरल्या , झाडांनी दवं धरले, सूर्यप्रकाश मिळाला नाही, औषधांची फवारणी करणे जिकिरीचे झाले, अशा वेळी भयानक परिस्थितीती उदभवली आण िऐंशी टक्के बागा कुजून गेल्या. नाशिक जिल्ह्यातील सर्वात महागडे आणि खर्चिक पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते. लाखो रु पये खर्च करून पीक उभे राहिले. यंदाच्या हंगामातील ऐंशी टक्के खर्च होऊन गेला अशा वेळी आलेल्या अस्मानी संकटाने काही क्षणात सर्व स्वप्न धुळीस मिळवले. परतीच्या पावसाने सायखेडा परिसरात सोयाबीन व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक