शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परतीच्या पावसाने द्राक्षबागांना फटका, भाजीपाला भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:27 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग दहा दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग दहा दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा डाऊनी, भुरी, कुज, गळ, या रोगांनी शेतकऱ्यांच्या हातातुन गेल्याने लाखो रु पये खर्च करून द्राक्ष बागा लावलेला शेतकरी धास्तावला आहे तर सोयाबीन पीक शेतात उभे असल्याने अतिपावसाने उभ्या झाडाच्या शेंगातील दाण्यांना कोंब फुटू लागले आहे. भाजीपाला भुईसपाट झाला आहेयंदा सुरवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने द्राक्ष हंगाम जोरात राहील अशी शक्यता वर्तवली जात होती शेतकर्यांनी वेळेवर छाटणी केली, फेल काढणे , शेंडा मारणे, डिपिंग करणे अशी सर्व कामे सुरळीत पार पडली. ८० टक्के बागा फुलोरा, आणि मनी सेट स्टेजमध्ये आल्या होत्या. अशा काळात सिंचनाद्वारे देणारे पाणी सुद्धा बंद करावे लागते जास्त प्रमाणात पाणी झाले तर मनी गळ आणि कुज होते घड रिंग करतात. त्यात पाणी साठलं जाते आणि साठलेल्या पाण्याने कुज येऊन केवळ घडाचे दांड शिल्लक राहतात. या अपरीपक्व काळात बाग टिकविणे मोठे कसरतीचे काम असते याच दरम्यान जास्त बागा आहे. खूप पाऊस पडला त्यामुळे झाडाला एकही पाण्याचा थेंब नको असतो त्या काळात बागा पाण्याने तुडुंब भरल्या , झाडांनी दवं धरले, सूर्यप्रकाश मिळाला नाही, औषधांची फवारणी करणे जिकिरीचे झाले, अशा वेळी भयानक परिस्थितीती उदभवली आण िऐंशी टक्के बागा कुजून गेल्या. नाशिक जिल्ह्यातील सर्वात महागडे आणि खर्चिक पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते. लाखो रु पये खर्च करून पीक उभे राहिले. यंदाच्या हंगामातील ऐंशी टक्के खर्च होऊन गेला अशा वेळी आलेल्या अस्मानी संकटाने काही क्षणात सर्व स्वप्न धुळीस मिळवले. परतीच्या पावसाने सायखेडा परिसरात सोयाबीन व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक