शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बागलाणच्या पश्चिम पट्ट्याला परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:49 IST

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या परतीच्या पावसाने दोन दिवसात सोंगणीस आलेल्या मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळिराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

परिसरात डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव सुरु होता. त्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीने भर टाकली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या रबी हंगामाची सुरु वात खराब झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. उन्हाळी कांदा रोपे तर भुईसपाट झाली असून मक्याच्या कापणीची कामे सुरु असताना वादळी वाºयासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लावणी योग्य आलेले उन्हाळी उळे, शेतात पडलेल्या मक्याची कणसे, मक्याचा चारा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा मका भुईसपाट झालेला आहे. कापणी केलेल्या मक्याच्या कणसांच्या ढिगात पाणी शिरल्याने त्या मक्याला कणसे उगण्याची भीती व्यक्त होतआहे. परिसरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसला. चार महिने राबराब राबून घेतलेल्या पिकांचे ऐन काढणी व कापणीच्या वेळेस झालेल्या नुकसानीने बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस