शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बागलाणच्या पश्चिम पट्ट्याला परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:49 IST

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या परतीच्या पावसाने दोन दिवसात सोंगणीस आलेल्या मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळिराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

परिसरात डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव सुरु होता. त्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीने भर टाकली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या रबी हंगामाची सुरु वात खराब झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. उन्हाळी कांदा रोपे तर भुईसपाट झाली असून मक्याच्या कापणीची कामे सुरु असताना वादळी वाºयासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लावणी योग्य आलेले उन्हाळी उळे, शेतात पडलेल्या मक्याची कणसे, मक्याचा चारा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा मका भुईसपाट झालेला आहे. कापणी केलेल्या मक्याच्या कणसांच्या ढिगात पाणी शिरल्याने त्या मक्याला कणसे उगण्याची भीती व्यक्त होतआहे. परिसरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसला. चार महिने राबराब राबून घेतलेल्या पिकांचे ऐन काढणी व कापणीच्या वेळेस झालेल्या नुकसानीने बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस