शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 01:48 IST

नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.

ठळक मुद्देनुकसान भरपाईची प्रतीक्षा

नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.नवी शेमळी येथील शेतकरी परशराम वाघ यांच्या पंधरा ते सोळा शेळ्या, दहा ते बारा शेळीची पिल्लू, गाय, एक वासरू यासह कांदाचाळीच्या जाळ्या, सतरा ट्रॉली मका, पाच ते सहा ट्रॉली कांदा, ?पेरिक्षा पुरात वाहून गेली. गुरांसाठी साठवून ठेवलेला मक्?याचा चाराही वाहून गेला. कोटींचे नुकसान झाल्याने वाघ यांना अश्रू अनावर झाले होते. सकाळी तलाठी चव्हाण, ग्राममसेवक साळुंखे व नवी शेमळीचे पोलीसपाटील, तेजस वाघ यांनी गावातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. आमदार दिलीप बोरसे यांनी या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. जुनी शेमळी येथील शेतकरी दादा अिहरे यांचे ?? गुंठे लागवड झालेल्या कांदा रोपांसह मका पिकाचे नुकसान झाले तसेच ??फूट विहीर गाळाने बुजली गेली. ?? हजार रु पयांचे गांवाजवळील धरणात टाकलेले मासे धरण भरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काही दिवसांपूवर्प विडलांचे छत्र हरपलेल्या अिहरे यांनी शेतीची उभारणी केली होती, मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.नुकसान भरपाईची प्रतीक्षाइगतपुरी तालुक्क्यात तासाभरातच शेतकर्यांच्या मुखातला घास हिरावला गेला आहे. मुख्य पीक असलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. पंचनामे व नुकसानभरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने आतातरी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करावेत, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी करीत आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी