शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

परतीच्या पावसाने पांढरे सोनेही काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:09 IST

सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.

ठळक मुद्देयंदा चाळीस टक्क्याने घटला कपाशीचा पेरा

सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.मागील वर्षी तालुक्यात १७ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी कांदा पिकाला मिळालेले चांगले बाजार भाव व करोनामुळे कापुस वेचणीसाठी परराज्यातील मजुर येतील का ? यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीपिकाचा पेरा ४० टक्क्याने कमी केला. या वर्षी तालुक्यात केवळ ९ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रात कपाशीपिकाची लागवड करण्यात आली आहे.सततच्या पावसाने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबिन, मका, मुग, भुईमुग आदी पिकांची नासाडी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी अस्मानी -सुलतानी संकटाने बेजार झाला आहे. तालुक्यात कापुस वेचणीच्या हंगामाला सुरूवात होताच परतीच्या पावसाने झोडपल्याने कापसाची प्रत खराब झाली आहे. गावागावात खाजगी व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी सुरु केली आहे.राज्य शासनाने कापसाला ५८२५ रुपये प्रति क्विंटलला हमीभाव जाहिर केला आहे. मात्र खाजगी व्यापारी केवळ ३८०० ते ४२०० रूपये प्रति क्विंटल दराने कापुस खरेदी करत आहे. रेन टच च्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट होत आहे.पूर्व मशागती पासुन ते वेचणीपर्यंत कपाशीपिकाला एकरी ३० हजार रूपये खर्च येतो. यंदाच्या अती पावसाने आलेल्या करपा व लाल्या रोगामुळे उत्पादन निम्म्याने घटले आहे. केवळ ऐकरी सरासरी ४ ते ७ क्विंटल पर्यंत उत्पादन पदरात पडणार आहे. उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा लेखाजोखा बघता शेतकऱ्यांच्या पदरी ढब्बु ही शिल्लक राहाणार नसल्याचेच चित्र आहे.यंदाच्या हंगामात परतीच्या पावसाने, करप्या व लाल्या रोगामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य द्यावे. उत्पादन घटल्याने बाजार भावतेजीत राहतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरत आहे.- पोपट उशीर, कापूस उत्पादक शेतकरी, सायगाव 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी