शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

परतीच्या पावसाने पांढरे सोनेही काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:09 IST

सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.

ठळक मुद्देयंदा चाळीस टक्क्याने घटला कपाशीचा पेरा

सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.मागील वर्षी तालुक्यात १७ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी कांदा पिकाला मिळालेले चांगले बाजार भाव व करोनामुळे कापुस वेचणीसाठी परराज्यातील मजुर येतील का ? यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीपिकाचा पेरा ४० टक्क्याने कमी केला. या वर्षी तालुक्यात केवळ ९ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रात कपाशीपिकाची लागवड करण्यात आली आहे.सततच्या पावसाने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबिन, मका, मुग, भुईमुग आदी पिकांची नासाडी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी अस्मानी -सुलतानी संकटाने बेजार झाला आहे. तालुक्यात कापुस वेचणीच्या हंगामाला सुरूवात होताच परतीच्या पावसाने झोडपल्याने कापसाची प्रत खराब झाली आहे. गावागावात खाजगी व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी सुरु केली आहे.राज्य शासनाने कापसाला ५८२५ रुपये प्रति क्विंटलला हमीभाव जाहिर केला आहे. मात्र खाजगी व्यापारी केवळ ३८०० ते ४२०० रूपये प्रति क्विंटल दराने कापुस खरेदी करत आहे. रेन टच च्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट होत आहे.पूर्व मशागती पासुन ते वेचणीपर्यंत कपाशीपिकाला एकरी ३० हजार रूपये खर्च येतो. यंदाच्या अती पावसाने आलेल्या करपा व लाल्या रोगामुळे उत्पादन निम्म्याने घटले आहे. केवळ ऐकरी सरासरी ४ ते ७ क्विंटल पर्यंत उत्पादन पदरात पडणार आहे. उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा लेखाजोखा बघता शेतकऱ्यांच्या पदरी ढब्बु ही शिल्लक राहाणार नसल्याचेच चित्र आहे.यंदाच्या हंगामात परतीच्या पावसाने, करप्या व लाल्या रोगामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य द्यावे. उत्पादन घटल्याने बाजार भावतेजीत राहतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरत आहे.- पोपट उशीर, कापूस उत्पादक शेतकरी, सायगाव 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी