शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

परतीच्या पावसाने खरीपावरचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:18 IST

घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे.

घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून पीक शेतातच पडून त्यात रोजच होणाºया परतीच्या पावसाने शेतकरी बेजार झालेले आहेत. रोजच प्रचंड वेगाने येणारे वादळी वारे आणि पाऊस यामुळं पीक पूर्णत: भुईसपाट झालेले आहे. सध्या रोजच दुपारनंतर पाऊस येत असून त्यामुळं दिवाळीच्या सणावर देखील पाणी फिरवले आहे. पावसाचे पाणी संपूर्ण खाचरांमध्ये असल्यामुळं सोंगणी ही पूर्णत: मजूर सांगून करावी लागणार आहे. भात काढणी यंत्र कोणत्याही प्रकारे शेतात वापरता येणार नाही. भात हे शेतकर्यांचे वार्षिक नगदी पीक आहे. भाताच्या होणार्या उत्पन्नातून पुढील रब्बी हंगामातील पीके अवलंबून आहेत. रब्बी हंगामात घेणारे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, कारले आदि पीके शेतकरी भात पिकातील होणाºया उत्पन्नातून घेत असतो. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण आहे. काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढून ठेवले असून रोजचा होणाºया पावसामुळं सोयाबीन शेंगा आण िदाणे काळे पडले असून तेही हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.----------------------यावर्षी होणार्या परतीच्या पावसाने भात पीक हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यातच या वर्षी भर पिकाची दुबार पेरणी व लागवड केलेली आहे. दुबार पेरणीच्या वेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करून लागवड केली असतानाच आजची स्थिती घटक आहे,त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना मदत द्यावी.- पंढरीनाथ काळे, शेतकरी पिंपळगाव मोर

टॅग्स :Nashikनाशिक