शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

168 कोटी जाणार व्याजासह परत

By admin | Updated: July 20, 2014 01:42 IST

168 कोटी जाणार व्याजासह परत

 

नामुष्की : भगूर पालिकेला गुंडाळावी लागणार योजनाविलास भालेराव ल्ल भगूरघरकुल योजनेसाठीचा भूखंड उपलब्ध करण्यास भगूर नगरपालिकेला अपयश आल्याने या योजनेसाठी पालिकेला प्राप्त झालेला १६८ कोटींचा निधी व्याजासह परत करण्याची सूचना केंद्र सरकारने केलेली आहे. यामुळे राज्यातील पहिल्या पालिकेतील घरकुल योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही बारगळला आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत दोन वर्षांपूर्वी भगूर नगरपालिकेला घरकुल योजनेसाठी ९५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत घरकुल योजना लागू करण्यासाठी भगूर पालिकेची निवड करण्यात आली होती. अशा प्रकारची योजना मिळणारी भगूर पालिका देशातील एकमेव पालिका ठरली होती. पालिकेला या योजनेसाठी १६८ कोटी रुपये प्राप्तदेखील झाले होते. परंतु ज्या जागेवर १८० घरांची घरकुल योजना राबविण्यात येणार होती त्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण दूर करण्यास आणि जागा ताब्यात घेण्यास पालिकेला प्रयत्न करूही अपयश आल्याने योजना बारगळली आहे. राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत भगूर गावातील सि.स.नं. ९४५अ/क जागेवर १८० घरकुले बांधण्याची योजना मंजूर झाली होती. या १८० घरांसाठी ९५१ कोटी ५६ लाख रुपये लागणार होते. त्याकरिता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी नगरपालिकेला १६८ कोटी ४५ लाख रुपये अनुदान देऊन १५ आॅक्टोबर २०१२ पासून बांधकाम करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पालिकेने झोपडपट्टीधारकांना घरकुलात घरे दिली जाणार असल्याचे सांगून झोपडपट्टी उठविण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले होते; परंतु झोपडपट्टीधारकांनी मोर्चा काढून न्यायालयात पालिकेविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. मात्र नगरपालिकेच्या मालकीची जागा असल्याने आणि झोपडपट्टीधारकांनाच घरकुले देण्याची योजना असल्याचे सांगून पालिकेच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर पालिकेने पोलीस आयुक्तांना २६ डिसेंबर २०१३, तसेच १ आणि २४ जानेवारी, तसेच २५ मार्च रोजी पालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस आयुक्तांना विनंती पत्र दिले होते. ५ जानेवारी रोजी पोलीस उपआयुक्त डी. एस. स्वामी यांनी भगूरला येऊन झोपडपट्टीची पाहणी करून नागरिकांची बैठकदेखील घेतली होती. मात्र त्यानंतर झोपडपट्टीधारकांनी सहकार्यच न केल्यामुळे अखेर ही योजनाच केंद्राने गुंडाळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पालिकेला दिलेला १६८ कोटींचा निधी हा व्याजासह पालिकेला परत करावा लागणार आहे. या वृत्तास पालिका प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी अधिकृतरीत्या कुणीही बोलण्यास तयार नाही.