शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

168 कोटी जाणार व्याजासह परत

By admin | Updated: July 20, 2014 01:42 IST

168 कोटी जाणार व्याजासह परत

 

नामुष्की : भगूर पालिकेला गुंडाळावी लागणार योजनाविलास भालेराव ल्ल भगूरघरकुल योजनेसाठीचा भूखंड उपलब्ध करण्यास भगूर नगरपालिकेला अपयश आल्याने या योजनेसाठी पालिकेला प्राप्त झालेला १६८ कोटींचा निधी व्याजासह परत करण्याची सूचना केंद्र सरकारने केलेली आहे. यामुळे राज्यातील पहिल्या पालिकेतील घरकुल योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही बारगळला आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत दोन वर्षांपूर्वी भगूर नगरपालिकेला घरकुल योजनेसाठी ९५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत घरकुल योजना लागू करण्यासाठी भगूर पालिकेची निवड करण्यात आली होती. अशा प्रकारची योजना मिळणारी भगूर पालिका देशातील एकमेव पालिका ठरली होती. पालिकेला या योजनेसाठी १६८ कोटी रुपये प्राप्तदेखील झाले होते. परंतु ज्या जागेवर १८० घरांची घरकुल योजना राबविण्यात येणार होती त्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण दूर करण्यास आणि जागा ताब्यात घेण्यास पालिकेला प्रयत्न करूही अपयश आल्याने योजना बारगळली आहे. राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत भगूर गावातील सि.स.नं. ९४५अ/क जागेवर १८० घरकुले बांधण्याची योजना मंजूर झाली होती. या १८० घरांसाठी ९५१ कोटी ५६ लाख रुपये लागणार होते. त्याकरिता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी नगरपालिकेला १६८ कोटी ४५ लाख रुपये अनुदान देऊन १५ आॅक्टोबर २०१२ पासून बांधकाम करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पालिकेने झोपडपट्टीधारकांना घरकुलात घरे दिली जाणार असल्याचे सांगून झोपडपट्टी उठविण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले होते; परंतु झोपडपट्टीधारकांनी मोर्चा काढून न्यायालयात पालिकेविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. मात्र नगरपालिकेच्या मालकीची जागा असल्याने आणि झोपडपट्टीधारकांनाच घरकुले देण्याची योजना असल्याचे सांगून पालिकेच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर पालिकेने पोलीस आयुक्तांना २६ डिसेंबर २०१३, तसेच १ आणि २४ जानेवारी, तसेच २५ मार्च रोजी पालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस आयुक्तांना विनंती पत्र दिले होते. ५ जानेवारी रोजी पोलीस उपआयुक्त डी. एस. स्वामी यांनी भगूरला येऊन झोपडपट्टीची पाहणी करून नागरिकांची बैठकदेखील घेतली होती. मात्र त्यानंतर झोपडपट्टीधारकांनी सहकार्यच न केल्यामुळे अखेर ही योजनाच केंद्राने गुंडाळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पालिकेला दिलेला १६८ कोटींचा निधी हा व्याजासह पालिकेला परत करावा लागणार आहे. या वृत्तास पालिका प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी अधिकृतरीत्या कुणीही बोलण्यास तयार नाही.